Marathi News

Aishwarya Rai Bachchan : जाती- धर्माबाबत ऐश्वर्या रायचे मोठं विधान; म्हणाली कि….

Published:
जगात एकच जात आहे.मानवतेची जात. धर्मही एकच आहे. प्रेमाचा धर्म. देव सर्वत्र आहे आणि खरी भाषा तीच जी हृदयाने बोलली जाते
Aishwarya Rai Bachchan : जाती- धर्माबाबत ऐश्वर्या रायचे मोठं विधान; म्हणाली कि….

Aishwarya Rai Bachchan : आंध्र प्रदेशातील पुट्टपार्थी येथे श्री सत्य साई बाबा यांच्या शताब्दी समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या विशेष प्रसंगी बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनची उपस्थिती आणि तिचा भावूक संदेश संपूर्ण कार्यक्रमाचे आकर्षण ठरला. सामान्यतः राजकीय किंवा मोठ्या सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये फार कमी वेळा दिसणारी ऐश्वर्या, या आध्यात्मिक सोहळ्यात मात्र अतिशय मनापासून सहभागी झाली. देशभरातील आध्यात्मिक गुरु, राजकीय नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालेला हा सोहळा अधिकच भव्य झाला

मंचावर येताच ऐश्वर्याने (Aishwarya Rai Bachchan) सत्य साई बाबांना वंदन करत भाषणाची सुरुवात केली. बोलताना ती अनेक क्षणी भावूक होताना दिसली. तिने सांगितले की, “बाबा नेहमी म्हणत की, जगात एकच जात आहे.मानवतेची जात. धर्मही एकच आहे. प्रेमाचा धर्म. देव सर्वत्र आहे आणि खरी भाषा तीच जी हृदयाने बोलली जाते. सत्य साई बाबांवरील तिची श्रद्धा आणि निष्ठा तिच्या प्रत्येक शब्दातून स्पष्ट जाणवत होती. सभागृहातील श्रोत्यांनीही तिच्या या मनापासूनच्या संदेशाला मोठा प्रतिसाद दिला.

पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीबद्दल विशेष आभार

या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदीही उपस्थित होते. आपल्या भाषणात ऐश्वर्याने त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाची शोभा वाढल्याचे सांगत त्यांचे आभार मानले. भाषण समाप्त झाल्यानंतर ऐश्वर्या मोदींच्या जवळ जाऊन त्यांचे आशिर्वाद घेताना दिसली. तिच्या या कृतीने उपस्थित पाहुण्यांचे लक्ष वेधले, तर सोशल मीडियावरही या दृश्याची मोठी चर्चा झाली. कार्यक्रमानंतर दोघांमध्ये झालेला थोडा औपचारिक संवादही प्रेक्षकांना पाहायला मिळाला. ऐश्वर्या आणि मोदी एका मंचावर एकत्र दिसणे हे स्वतःमध्ये दुर्मीळ दृश्य असल्याने हा क्षण अधिक खास ठरला.

ऐश्वर्याचा सत्य साई बाबांवरील दृढ विश्वास Aishwarya Rai Bachchan

ऐश्वर्या राय आणि तिचे संपूर्ण कुटुंब सत्य साई बाबांचे भक्त आहेत. तिच्या मते, जीवनातील अनेक महत्त्वाचे निर्णय तिने बाबांच्या तत्त्वांच्या आधारे घेतले आहेत. प्रेम, समता आणि सेवा हे बाबांचे संदेश तिच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यामुळेच या शताब्दी सोहळ्यात ती स्वतःहून सहभागी झाल्याचे अनेकांनी अधोरेखित केले.

बॉलिवूडमधील यश आणि वैयक्तिक जीवनावरील मौन

बॉलिवूडमध्ये ऐश्वर्याने अनेक वर्षे उत्तुंग यश मिळवले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव कमावण्यातही ती यशस्वी ठरली. गेल्या काही महिन्यांपासून तिच्या आणि अभिषेक बच्चन यांच्या नात्यावर विविध चर्चा होत असल्या तरी ऐश्वर्याने या कार्यक्रमात त्या कोणत्याही गोष्टीवर भाष्य करणे टाळले. अभिषेकनेही या विषयावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

पुट्टपार्थीतील या कार्यक्रमाने ऐश्वर्या रायचा आध्यात्मिक आणि संवेदनशील पैलू पुन्हा एकदा समोर आणला. तिचा मुख्य संदेश असा होता की, “आपण कोणत्याही जात, धर्म किंवा भाषेचे असलो तरी मानवता आणि प्रेम हीच आपली खरी ओळख असली पाहिजे.” तिच्या या संदेशामुळे कार्यक्रमात केवळ भक्तांनाच नव्हे तर देशभरातील अनेकांना नव्याने विचार करण्यास प्रवृत्त केले आहे. एकूणच, हा कार्यक्रम ऐश्वर्या रायच्या आध्यात्मिक बांधिलकीचा आणि सत्य साई बाबांच्या शिकवणींवरील तिच्या दृढ श्रद्धेचा आणखी एक ठोस पुरावा ठरला.

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews