Marathi News

दिवाळीत एसटीला ‘अच्छे दिन’; प्रवाशांची संख्या वाढल्याने उत्पन्नात मोठी भर!

Written by:Rohit Shinde
Published:
प्रवाशांच्या प्रतिसादामुळे एसटीच्या तिजोरीत सुमारे 6 कोटी रुपये जमा झाले आहेत, जे मागील वर्षाच्या तुलनेत 2.10 कोटी रुपये जास्त आहे. ही आकडेवारी फक्त स्वारगेट, पिंपरी, चिंचवड, शिवाजीनगर आणि वल्लभनगर आगाराची आहे.
दिवाळीत एसटीला ‘अच्छे दिन’; प्रवाशांची संख्या वाढल्याने उत्पन्नात मोठी भर!

दिवाळी हा सण आनंद, भेटीगाठी आणि प्रवासाचा असतो. या काळात एसटी महामंडळाच्या बससेवेला मोठा प्रतिसाद मिळतो. गावाकडे जाणारे प्रवासी, नातेवाईकांना भेट देणारे आणि पर्यटनासाठी जाणारे नागरिक यामुळे प्रवाशांची संख्या लक्षणीय वाढते. या वाढत्या गर्दीला तोंड देण्यासाठी एसटी प्रशासनाकडून अतिरिक्त बसेस सोडल्या जातात आणि प्रवाशांच्या सोयीसाठी विशेष व्यवस्था केली जाते.

तिकीट आरक्षण, वेळापत्रक आणि सुरक्षा यावर विशेष भर दिला जातो. प्रत्येक प्रवाशाचा सुरक्षित आणि सुखद प्रवास सुनिश्चित करण्यासाठी चालक आणि कर्मचाऱ्यांना विशेष सूचना दिल्या जातात. त्यामुळे दिवाळीत एसटीचा प्रवास हा सुरक्षित, सोयीस्कर आणि आनंददायी ठरतो. अशा परिस्थितीत एसटीच्या उत्पन्नात देखील या काळात मोठी वाढ होत असते.

दिवाळीत एसटीच्या उत्पन्नात वाढ

दिवाळी सणानिमित्त अनेक नागरिक गावी जाण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीचा वापर मोठ्या प्रमाणात करतात. राज्य परिवहन महामंडळाने (एसटी) 15 ते 18 ऑक्टोबर या चार दिवसांत पुणे विभागातील स्वारगेट, शिवाजीनगर आणि पिंपरी-चिंचवड या तीन स्थानकांवरून बसच्या सहा हजार फेऱ्या पूर्ण केल्या. या फेऱ्यांमुळे सुमारे अडीच लाख प्रवाशांनी प्रवास केला. प्रवाशांच्या प्रतिसादामुळे एसटीच्या तिजोरीत सुमारे 6 कोटी रुपये जमा झाले आहेत, जे मागील वर्षाच्या तुलनेत 2.10 कोटी रुपये जास्त आहे.

दिवाळी सणानिमित्त प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन राज्य परिवहन महामंडळाने (एसटी) पुणे विभागातील स्वारगेट, वाकडेवाडी (शिवाजीनगर) आणि वल्लभनगर (पिंपरी-चिंचवड) या स्थानकांमधून 589 अतिरिक्त फेऱ्या राबवल्या. त्यामुळे 15 ते 18 ऑक्टोबर या चार दिवसांत एकूण सहा हजार फेऱ्या पूर्ण झाल्या. अडीच लाखाहून अधिक प्रवाशांनी या कालावधीत बससेवा वापरली. विशेषत: वाकडेवाडी बस स्थानकावरून नाशिक, छत्रपती संभाजीनगर, बीड, अहिल्यानगर, लातूर, धाराशिव आणि परभणीसाठी 900 फेऱ्यांची वाढ करण्यात आली.

एसटीला प्रवाशांची पहिली पसंती

दिवाळी सणानिमित्त दरवाढ न करता अतिरिक्त 589 गाड्या राबवल्याने प्रवाशांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला. विशेषत: खासगी वाहतूक करणाऱ्यांकडून अतिरिक्त दर आकारण्यात आल्याने प्रवाशांनी ‘एसटी’ला प्राधान्य दिले आहे. तिकीट आरक्षण, वेळापत्रक आणि सुरक्षा यावर विशेष भर दिला जातो. प्रत्येक प्रवाशाचा सुरक्षित आणि सुखद प्रवास सुनिश्चित करण्यासाठी चालक आणि कर्मचाऱ्यांना विशेष सूचना दिल्या जातात. त्यामुळे दिवाळीत एसटीचा प्रवास हा सुरक्षित, सोयीस्कर आणि आनंददायी ठरतो.

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews