मुंबईकरांसाठी मोठी बातमी! सोमवार, मंगळवार या भागातील पाणीपुरवठा राहणार बंद!

Written by:Rohit Shinde
Published:
मुंबईकरांसाठी एक मोठी आणि महत्वाची बातमी समोर येत आहे, त्यानुसार सोमवारी आणि मंगळवारी मुंबईच्या काही भागांतील पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! सोमवार, मंगळवार या भागातील पाणीपुरवठा राहणार बंद!

पाणी पुरवठा बंद राहणं, ही बाब मुंबईकरांसाठी नेहमीच डोकेदुखी ठरत असते. आता त्यासंदर्भाने एक महत्वाची बातमी समोर आली आहे.  सोमवार आणि मंगळवारी मुंबईतील काही भागाचा पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. काही दुरूस्ती आणि जोडणीच्या कामांमुळे हा पाणीपुरवठा बंद असणार आहे, अशी माहिती जलव्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे.

कुठे बंद राहणार पाणी पुरवठा?

कांदिवली (पूर्व) येथील ठाकूर संकुलद्वार, पश्चिम द्रुतगती महामार्ग येथे 900 मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीसोबत 900 मिलीमीटर व्यासाची अन्य जलवाहिनी जोडणे तसेच 900 मिलीमीटर व्यासाची झडप बसविणे ही कामे हाती घेण्यात येणार आहेत. सोमवार, 2 जून 2025 रोजी दुपारी 1.30 वाजेपासून मंगळवार, 3 जून 2025 रोजी सकाळी 7.30 वाजेपर्यंत हे काम करण्याचे नियोजित आहे.

या कालावधीत म्हणजे सोमवार, 2 जून 2025 रोजी दुपारी 1.30 वाजेपासून मंगळवार, 3 जून 2025 रोजी सकाळी 7.30 वाजेपर्यंत संपूर्ण जलवाहिनीचा पाणीपुरवठा बंद करावा लागणार आहे. दुरुस्तीच्या प्रत्यक्ष कालावधीत आर दक्षिण विभागातील खालील परिसरांमध्ये पाणीपुरवठा होणार नाही.
आर दक्षिण विभाग : ठाकूर गाव, समता नगर म्हाडा, चिखलवाडी, जानूपाडा, कांदिवली (पूर्व) (नियमित पाणी पुरवठ्याची वेळ – सायंकाळी 6.25 ते रात्री 8.25) (दिनांक 2 जून 2025 रोजी पाणीपुरवठा पूर्णत: बंद राहील).
मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येणाऱ्या या कामामुळे संबंधित विभागातील नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून पाण्याचा आवश्यक साठा करुन ठेवावा. तसेच पाणीपुरवठा बंदच्या कालावधीत काटकसरीने पाणी वापरुन सहकार्य करावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. नागरिकांना महापालिकेने या संदर्भाने सूचना केल्या आहेत.

 

पाणी पुरवठा बंद राहण्याचे कारण?

मुंबईतील काही भागातील पाणी पुरवठा सोमवार आणि मंगळवारी बंद ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती आहे. जलवाहिनी जोडणी आणि झडप बसविण्याच्या कामासाठी हा पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून तसेच काटकसरीने वापरण्याचे आवाहन मुंबई महानगरपालिकेने केले आहे. त्यासोबतच आवश्यक पाण्याचा साठा करुन ठेवण्याचे आवाहनही मुंबई महानगरपालिकेने नागरिकांना केले आहे. त्यामुळे या दिवसांत मुंबईच्या संबंधित भागांतील नागरिकांना पाण्याचा जपून वापर करावा लागणार आहे.

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews