कर्नाटक सरकारने कृष्णा नदीवरील अलमट्टी धरणाची जलाशय पातळी 519.6 मीटरवरून 524.256 मीटरपर्यंत वाढविण्याचा प्रस्ताव दिला असून, यामुळे महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर आणि कृष्णा खोऱ्यातील भागांना पूराचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खरंतर आक्रमक भूमिका घेतली आहे. कर्नाटक सरकारने तसा काही निर्णय घेतल्यास आम्ही थेट सुप्रीम कोर्टात जाऊ, असा इशाराच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिला आहे.
मुख्यमंत्री फडणवीसांची कठोर भूमिका
अलमट्टीची उंची वाढवण्याचा प्रयत्न कर्नाटक सरकारनं केला तर आम्ही सर्वोच्च न्यायालयात त्याविरोधात जाऊ, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. कर्नाटक सरकारकडून पुन्हा एकदा अलमट्टी धरणाच्या उंचीवाढीसाठी प्रयत्न सुरु केले आहेत. त्यामुळे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यासाठी अलमट्टी उंची वाढणे धोक्याची घंटा आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचे सांगितले. हाराष्ट्र आणि कर्नाटक दरम्यान 2019 साली झालेल्या करारानुसार 15 ऑगस्टपूर्वी कर्नाटकने अलमट्टीतील पाणीसाठा 517 मीटरपेक्षा खाली ठेवायचा आहे, पण कर्नाटकने हा करार पाळलेला नाही.
🕞 3.18pm | 11-9-2025📍Mumbai.
LIVE | Media Interaction#Maharashtra #Mumbai https://t.co/CHQkx7kFwl
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) September 11, 2025






