Marathi News

अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी लांबणार?; विद्यार्थ्यांचं मोठं शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता

Written by:Rohit Shinde
Published:
11 वी प्रवेशासाठी 26 जून रोजी पहिली गुणवत्ता यादी जाहीर होण्याची अपेक्षा होती. ही यादी आता चार ते पाच दिवस पुढे ढकलली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.
अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी लांबणार?; विद्यार्थ्यांचं मोठं शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता

अकरावी प्रवेश हा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आयुष्यातील एक महत्वाचा टप्पा असतो, परंतु आता यामध्ये दिरंगाई होत असल्याची बाब समोर येत आहे. जून संपत आला तरी प्रवेश प्रक्रियेला म्हणावी अशी गती मिळालेली नाही, अकरावी प्रवेशासाठी 26 जून रोजी पहिली गुणवत्ता यादी जाहीर होण्याची अपेक्षा होती. ही यादी आता चार ते पाच दिवस पुढे ढकलली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे चालू शैक्षणिक वर्ष प्रभावित होण्याची भीती निर्माण झाली आहे. दरम्यान आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत ही यादी जाहीर होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पहिली गुणवत्ता यादी लांबणीवर?

राज्यातील लाखो विद्यार्थी अकरावीच्या प्रवेशासाठी प्रतीक्षेत आहेत. या प्रवेश प्रक्रियेतील विलंबामुळे विद्यार्थ्यांमधील निराशा वाढली आहे. पहिली गुणवत्ता यादी आज सकाळी 11 वाजता जाहीर होणार असल्याचे सांगण्यात आले होते. परंतु आता ही यादी पुन्हा एकदा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. यामुळे विद्यार्थ्यांचं मोठं शैक्षणिक नुकसान होत आहे.

शिक्षण संचालनालयाने यापूर्वी 10 जून रोजी जाहीर होणारी पहिली गुणवत्ता यादी 26 जून रोजी जाहीर होईल असे सांगितले होते. मात्र, आता अल्पसंख्याक कोट्याबाबत उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार राज्य सरकारला काही बदल करावे लागणार असल्याने, ही यादी जाहीर होण्यास आणखी विलंब होणार आहे. त्यामुळे आज ही यादी जाहीर होणार का हे पाहावे लागेल.

विद्यार्थ्यांचं मोठं शैक्षणिक नुकसान होणार

11 वी प्रवेशासाठी 26 जून रोजी पहिली गुणवत्ता यादी जाहीर होण्याची अपेक्षा होती. ही यादी आता चार ते पाच दिवस पुढे ढकलली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे चालू शैक्षणिक वर्ष प्रभावित होण्याची भीती निर्माण झाली आहे. दरम्यान आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत ही यादी जाहीर होणार का? हे पाहावे लागेल. तसेच यासंदर्भात अधिकृत माहिती विद्यार्थी आणि पालकांना प्रतिक्षा आहे. अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेला दरवर्षी होणाऱ्या या विलंबाचा फटका विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याला बसत आहे.

यावर्षी राज्य मंडळाने दहावीचे निकाल 15 दिवस लवकर जाहीर केले होते, तरीही तांत्रिक अडचणींमुळे प्रवेश प्रक्रियेत गोंधळ निर्माण झाला. अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरू होताच विद्यार्थ्यांना नोंदणीच्या टप्प्यावरच अनेक अडचणींचा सामना करावा लागला.
Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews