2008 मध्ये मालेगाव बॉम्ब स्फोटाचा अलीकडेच मुंबई विशेष न्यायालयाने निकाल दिला आहे. यामध्ये कोर्टाने या प्रकरणात साध्वी प्रज्ञासिंह ठाकुरांसह सर्व आरोपींना निर्दोष मुक्त केले. मोटार सायकलमध्ये स्फोट झाल्याचेही सिद्ध झाले नाही, स्फोट झाल्याचे सिद्ध होत नाही, असे म्हणत कोर्टाने सातही आरोपींना निर्दोष मुक्त केले आहे. साध्वी प्रज्ञा सिंह ठाकुर, कर्नल पुरोहित, रमेश उपाध्याय, समीर कुलकर्णी, अजय राहिरकर, सुधाकर द्विवेदी, सुधाकर चतुर्वेदी अशी या सात आरोपींची नावे आहेत. त्यामुळे तपास यंत्रणेला हा मोठा धक्का मानला जात आहे. त्यानंतर आता साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी अनेक धक्कादायके दावे केले आहेत.
प्रज्ञासिंह ठाकुरांचा काय दावा?
न्यायालयाच्या निर्णयानंतर प्रज्ञा ठाकूर यांनी चौकशीदरम्यान आपल्या वागणुकीबाबत धक्कादायक आरोप केला. त्यांनी दावा केला की, तपास यंत्रणांनी त्यांच्यावर अमानुष अत्याचार केला आणि बेकायदेशीरपणे ताब्यात ठेवले. त्यावेळी त्या म्हणाल्या की, “माझ्यावर नरेंद्र मोदी, योगी आदित्यनाथ, मोहन भागवत, सुरेश (सुदर्शन), इंद्रेश कुमार आणि राम माधव यांची नावे घेण्यासाठी जबरदस्ती करण्यात आली,” असं त्यांनी म्हटलं. “त्यांनी मला सांगितलं की, मी जर या लोकांची नावं घेतली, तर मला त्रास दिला जाणार नाही. त्यांचा हेतू मला मानसिकरित्या खचवण्याचा आणि खोटे कबूल करून घेण्याचा होता. पण मी कोणाचंही नाव घेतलं नाही.”
NIA न्यायालयाचा हा निकाल भारतातील सर्वाधिक वादग्रस्त दहशतवादी खटल्यांपैकी एका प्रकरणावर कायदेशीर टोक आणतो. मात्र, ठाकूर यांच्या नव्या आरोपांमुळे या प्रकरणातील सुरुवातीच्या तपासाच्या पद्धतीबाबत पुन्हा एकदा चर्चा आणि चौकशी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रज्ञासिंह ठाकुरांच्या या धकाकादायक दाव्यांमुळे एकच खळबळ माजली आहे.






