राष्ट्रीय महामार्गावरील टोल टॅक्स हा नेहमीच सर्वसामान्यांसाठी डोकेदुखी असतो. त्यामध्ये आता केंद्र सरकारच्या एका निर्णयामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. सरकारने एक मोठा निर्णय घेत सर्वसामान्यांना दिलासा दिला आहे. सरकारने राष्ट्रीय महामार्गावरील टोल शुल्क 50% पर्यंत कमी केले आहे. ही कपात विशेषतः ज्या महामार्गांवर पूल, बोगदे, उड्डाणपूल आहेत अशा ठिकाणी करण्यात आली आहे. येथे प्रवाशांना कमी टोल भरावा लागेल. यामुळे प्रवासाचा खर्च कमी होईल आणि रस्ते प्रवास पूर्वीपेक्षा स्वस्त होईल. या निर्णयाचे सर्व स्तरांतून स्वागत होताना दिसत आहे.
कशी असेल टोल वसूली?
- संरचनेच्या लांबीच्या दहा पट जोडून.
- विभागाच्या एकूण लांबीच्या पाच पट.
यापैकी जे कमी असेल ते, त्या आधारावर शुल्क निश्चित केले जाईल. येथे ‘रचना’ म्हणजे – स्वतंत्र पूल, बोगदा, उड्डाणपूल किंवा उन्नत महामार्ग.
- 10 x 40 = 400 किलोमीटर (संरचनेच्या लांबीच्या 10 पट)
- 5 x 40 = 200 किलोमीटर (विभागाच्या एकूण लांबीच्या 5 पट)
कमी अंतराच्या (200 किलोमीटर) आधारावर टोल शुल्क आकारले जाईल. यामुळे टोल दरांमध्ये सुमारे 50 टक्के थेट सूट मिळते.
टोल रक्कम कमी; वाहनधारकांना दिलासा
केंद्र सरकारने वाहनधारकांना दिलासा देणारा मोठा निर्णय घेतला आहे. देशभरातील विविध राष्ट्रीय महामार्गांवरील टोल दरांमध्ये कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे सर्वसामान्य प्रवाशांना आर्थिक सवलत मिळणार आहे. वाढत्या इंधनदरांमुळे आधीच त्रस्त असलेल्या वाहनचालकांसाठी ही टोल कपात दिलासादायक ठरणार आहे. नवीन दर लागू झाल्यानंतर लांबच्या प्रवासाचा खर्च थोडा कमी होणार आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे वाहतूक अधिक सुलभ होणार असून, टोल नाक्यांवरील वाहतूक कोंडीही कमी होण्याची शक्यता आहे. ही टोल कपात धोरणात्मक असून, नागरिकांचे हित लक्षात घेऊन घेतलेली आहे. त्यामुळे प्रवाशांकडून या निर्णयाचे स्वागत केले जात आहे.






