Politics News : संपूर्ण महाराष्ट्रात महापालिका निवडणुकीची धामधूम सुरू आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू आहे ठिकठिकाणी सभा आणि रॅली निघत आहेत. यातच लातूर महापालिकेच्या प्रचारादरम्यान भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी काँग्रेसचे दिवंगत नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या बद्दल केलेल्या एका विधानामुळे नवा वाद पेटला आहे. भाजप कार्यकर्त्यांचा उत्साह पाहता लातूरमधून विलासराव देशमुखांच्या आठवणी पुसल्या जातील यात शंका नाही असं रवींद्र चव्हाण म्हणाले. रवींद्र चव्हाण यांच्या या वक्तव्यानंतर काँग्रेसकडून निषेध व्यक्त केला जात आहे.
रवींद्र चव्हाण नेमकं काय म्हणाले? Politics News
लातूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप कार्यकर्त्यांच्या मेळावा पार पडला. या मेळाव्यास भाजप नेते आ. संभाजी पाटील निलंगेकर, आ. अभिमन्यू पवार, आ. रमेश कराड, माजी मंत्री बसवराज पाटील मुरूमकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना रवींद्र चव्हाण म्हणाले की, भाजप कार्यकर्त्यांचा उत्सव पाहून लक्षात येते की लातूर शहरातून विलासराव देशमुखांच्या आठवणी पुसल्या जातील, यात काही शंका नाही. रवींद्र चव्हाण यांच्या या विधानानंतर विरोधकांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. Politics News
विलासराव देशमुख हे लोकनेते
विलासराव देशमुख हे फक्त लातूर पुरते मर्यादित नव्हते. तर त्यांचा संपूर्ण महाराष्ट्रात प्रभाव होता. महाराष्ट्राचे नेतृत्व त्यांनी 3 वेळा केले होते. याशिवाय केंद्रातही त्यांना गांधी परिवाराकडून मोठी जबाबदारी देण्यात आली होती. विलासराव देशमुख यांची नाळ थेट जनतेशी जोडलेली असल्याने त्यांना लोकनेता बोलले जायचं. मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात त्यांनी महाराष्ट्रासाठी अनेक क्रांतिकारी निर्णय घेतले होते. नाही का गंभीर आजाराने त्यांचं काही वर्षांपूर्वी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर रवींद्र चव्हाण यांनी थेट लातूरमध्ये जाऊन विलासराव देशमुख यांच्या बद्दल अशा प्रकारचे विधान केल्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.






