कर्नाटक सरकारने बेंगळूरुमधील चेंगराचेंगरी प्रकरणाचा अहवाल सादर केला आहे. यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरु (RCB) संघाने आयपीएल ट्रॉफी जिंकल्यानंतर कोणतीही परवानगी न घेता विजयोत्सव साजरा केल्याचे म्हटले आहे. थोडक्यात सरकारने संबंधित चेंगराचेंगरीसाठी बंगळुरू संघ व्यवस्थापन जबाबदार असल्याचे मान्य केले आहे.
बंगळुरू संघ व्यवस्थापनावर ठपका!
सुरुवातीला केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणाने (CAT) चिन्नास्वामी क्रिकेट स्टेडियममधील चेंगराचेंगरीसाठी रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरुला (RCB) जबाबदार धरले होते. आवश्यक परवानग्यांशिवाय आरसीबीने हा मेळावा आयोजित केल्याचे न्यायाधिकरणाने म्हटले होते. त्यानंतर आता कर्नाटक सरकारने रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरु (RCB) संघाला या दुर्घटनेसाठी जबाबदार धरल्याचे समजते आहे. तसा अहवाल समोर आला आहे.
कर्नाटक सरकारने बेंगळूरुमधील चेंगराचेंगरी प्रकरणाचा अहवाल सादर केला आहे. यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरु (RCB) संघाने आयपीएल ट्रॉफी जिंकल्यानंतर कोणतीही परवानगी न घेता विजयोत्सव साजरा केल्याचे म्हटले आहे. कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर हा अहवाल सार्वजनिक करण्यात आला, कारण न्यायालयाने अहवाल गोपनीय ठेवण्याची गरज नसल्याचे म्हटले होते. आयपीएल 2025 मध्ये आरसीबीच्या विजयानंतर आयोजित करण्यात आलेल्या विजयोत्सवावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत 11 लोकांचा मृत्यू झाला होता, तर अनेक जण जखमी झाले होते.




