IPL 2025: आयपीएलमध्ये आज बंगळूरू वि. राजस्थान, मुंबई वि. दिल्ली सामने

Written by:Rohit Shinde
Published:
आयपीएलचे आज दोन सामने होणार आहेत, पहिल्या सामन्यात बंगळुरूआणि राजस्थान दुसरा सामना मुंबई इंडियन्स आणि दिल्ली या संघांत होईल. दोन्ही सामन्यांकडे आयपीएल रसिकांचं लक्ष असणार आहे.
IPL 2025: आयपीएलमध्ये आज बंगळूरू वि. राजस्थान, मुंबई वि. दिल्ली सामने

मुंबई: आयपीएल 2025 च्या हंगामात आज डबल धमाका पाहायला मिळणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरूद्ध राजस्थान रॉयल्स हा पहिला सामना असेल. आज दुपारी 03.30 वाजता हा सामना जयपुरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर खेळला जाणार आहे. तर दुसरा सामना मुंबई इंडियन्स विरूद्ध दिल्ली कॅपिटल्स असा होईल. दिल्लीच्या अरूण जेटली स्टेडियमवर रात्री आठ वाजता हा सामना सुरू होईल, दोन्ही सामन्यांकडे आयपीएल रसिकांचं विशेष लक्ष असणार आहे. कारण आयपीएलचे साखळी सामने आता रंगतदार वळणावर येऊन पोहोचले आहेत.

रॉयल चॅलेंजर्स राजस्थानच्या संघाला भिडणार!

आजचा आयपीएलचा पहिला सामना अत्यंत महत्वाचा असणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरूद्ध राजस्थान रॉयल्स हा पहिला सामना असेल. कारण राजस्थान अशो किंवा आरसीबी आयपीएलमधील आपलं आव्हान कायम ठेवण्यासाठी दोन्ही संघांसाठी हा सामना जिंकणं अत्यंत महत्वाचं आहे. आरसीबीने आजवर खेळलेल्या 5 सामन्यांपैकी 3 सामने जिंकत गुणतालिकेत चौथ स्थान मिळवलं आहे. तर राजस्थानचा संघ खेळलेल्या 5 पैकी 2 सामने जिंकत 7 व्या स्थानावर आहे. दोन्ही संघाचा आजवरचा इतिहास पाहिला असता शेवटच्या 32 सामन्यांपैकी आरसीबीने 15 तर राजस्थानने 14 सामने जिंकले आहेत. म्हणजेच दोन्ही संघात अटीतटीचा सामना होऊ शकतो, समिक्षकांचे मत विचारात घेतल्यास असे दिसते की आरसीबी हा सामना जिंकेल,

आरसीबीचा कॅप्टन रजत पाटीदार, विराट कोहली, देवदत्त पडीकल, स्वस्तिक चिकारा, टीम डेव्हिड, जॉस हेझलवूड, भुवनेश्वर कुमार यांच्यावर प्रामुख्याने जबाबदारी असणार आहे. तर राजस्थान रॉयल्ससाठी कॅप्टन संजू सॅमसन, शुभम दुबे, नितेश राणा, संदीप शर्मा, जोफरा आर्चर यांचे योगदान महत्वाचे असेल.

दिल्ली विरूद्ध मुंबई, कोण जिंकणार?

मुंबईसाठी 2025 चा आयपीएल हंगाम अडचणीचा ठरला आहे. मुंबईला आजवर खेळलेल्या 5 पैकी अवघ्या एका सामन्यात विजय मिळवता आला आहे. संघ गुणतालिकेत नवव्या स्थानावर आहे. तर दुसरीकडे दिल्लीच्या संघाने 4 सामने खेळले असून सर्व जिंकले आहेत. कॅपिटल्सचा संघ चांगल्या लयीत आहे. मुंबईला आपले आव्हान कायम ठेवण्यासाठी आज विजय मिळवणं अत्यंत गरजेच असणार आहे. तर दिल्ली आपली विजय घोड़दौड कायम ठेवण्यासाठी प्रयत्नशील असेल, दोन्ही संघांतील शेवटच्या 35 सामन्यांपैकी मुंबईन 19 तर दिल्लीने 16 सामने जिंकले आहेत. जाणकारांच्या मते मुंबई ही मॅच जिंकू शकते.

कॅप्टन हार्दिक पंड्या, रोहित शर्मा, सुर्यकुमार यादव, ट्रेंट बोल्ट, करण शर्मा यांच्या कामगिरीवर मुंबई संघाचं यशापयश अवलंबून असणार आहे. दुसरीकडे कर्णधार अक्षर पटेलच्या नेतृत्वात दिल्ली कॅपिटल्स चांगली कामगिरी करत आहेत.

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews