Jaya Bachchan : आयुष्याचा आनंद घ्या, लग्न नको; जया बच्चन यांच्या वक्तव्याने खळबळ

Published:
लग्न केले तरी समस्या येऊ शकतात आणि न केल्यासही काही गोष्टींविषयी खंत राहू शकते. पण आजच्या तरुणांना स्वतःचे निर्णय घ्यायला आणि त्यांच्या भावनिक-सामाजिक गरजांनुसार जीवन जगायला कोणीही रोखू नये, असे मत त्यांनी व्यक्त केले.
Jaya Bachchan : आयुष्याचा आनंद घ्या, लग्न नको; जया बच्चन यांच्या वक्तव्याने खळबळ

Jaya Bachchan : बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन यांनी लग्न या संकल्पनेविषयी केलेले नवीन विधान सध्या चर्चेत आहे. 77 वर्षीय जया बच्चन यांनी आधुनिक काळात लग्न ही कल्पना “जुनी विचारसरणी” असल्याचे सांगितले असून, आपल्या नात नव्या नवेली नंदाने लग्न करू नये, असे स्पष्ट मत व्यक्त केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर आणि चाहत्यांमध्ये मोठी चर्चा रंगली आहे.

काय म्हणाल्या जया बच्चन (Jaya Bachchan)

‘वी द वुमेन’सोबतच्या संवादात जेव्हा जया बच्चन यांना विवाहाविषयी विचारण्यात आले, तेव्हा त्यांनी म्हटले, “फक्त आयुष्याचा मनमुराद आनंद घ्या.” पुढे नव्या नवेली नंदाच्या लग्नाबद्दल प्रश्न उपस्थित होताच त्यांनी सरळ सांगितले, “मी नव्याने लग्न करावे, असे अजिबात इच्छित नाही.” आजची तरुण पिढी जास्त समजदार असून परंपरेला आव्हान देण्याची त्यांच्यात क्षमता आहे, असेही त्यांनी नमूद केले. (Jaya Bachchan)

लग्नाची तुलना लाडू सोबत

समकालीन नातेसंबंधांवर बोलताना जयांनी लग्नाची तुलना लाडूसोबत करून सांगितले की, लग्न केले तरी समस्या येऊ शकतात आणि न केल्यासही काही गोष्टींविषयी खंत राहू शकते. पण आजच्या तरुणांना स्वतःचे निर्णय घ्यायला आणि त्यांच्या भावनिक-सामाजिक गरजांनुसार जीवन जगायला कोणीही रोखू नये, असे मत त्यांनी व्यक्त केले.

नातेसंबंध, मानसिक संतुलन आणि आधुनिक विचारसरणी यावर जया बच्चन यांनी पूर्वीही नव्या नवेली नंदाच्या पॉडकास्टमध्ये स्पष्ट भूमिका मांडली होती. त्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या काळात असे प्रयोग करणे किंवा परंपरेच्या विरुद्ध जाणे कठीण होते; मात्र आजची पिढी अधिक आत्मविश्वासाने नाती, करिअर आणि वैयक्तिक निर्णय हाताळू शकते.

जया बच्चन यांचे हे मत सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून, याबाबत तरुण पिढीकडून मिश्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. काही जण त्यांच्या प्रगतिशील भूमिकेला दाद देत आहेत, तर काहींना त्यांचे वक्तव्य अनपेक्षित वाटले. मात्र एक गोष्ट निश्चित—जया बच्चन यांनी पुन्हा एकदा आपल्या बेधडक मतांनी समाजात नवी चर्चा सुरू केली आहे.