राजस्थानच्या जैसलमेरमध्ये एका धावत्या बसला आग लागल्याची भीषण घटना समोर आली आहे. या अपघातात आतापर्यंत 20 जणांचा मृत्यू झाला आहे. मोठ्या प्रमाणात भाजल्याने 16 जणांची प्रकृती गंभीर आहे. जखमींवर जोधपूर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर पंतप्रधान मोदींनी दुःख व्यक्त केले आहे, तसेच पंतप्रधान मदत निधीतून मदतीची घोषणा देखील केली आहे. राजस्थानमधील जैसलमेर हा भाग पर्यटनासाठी विशेष प्रसिद्ध आहे.
बसला भीषण आग; 20 जणांचा मृत्यू
मंगळवारी दुपारी भीषण अपघातात एका खासगी बसमध्ये आग लागून 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला, तर 16 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. ही बस सुमारे 57 प्रवाशांना घेऊन जैसलमेर येथून जोधपूरकडे निघाली होती. प्रवास सुरू झाल्यानंतर काही मिनिटांतच बसच्या मागील भागातून धूर येऊ लागला. चालकाने बस रस्त्याच्या कडेला थांबवली, पण क्षणातच बसला भीषण आग लागली आणि ती संपूर्ण बसमध्ये पसरली.
निक नागरिक, वाटसरू आणि लष्करी जवानांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केलं. अग्निशमन दल व पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवले. गंभीर जखमींना जैसलमेर येथील जवाहर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं असून 16 जणांना पुढील उपचारांसाठी जोधपूरमध्ये हलवण्यात आलं आहे. प्राथमिक तपासानुसार ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
तांत्रिक बिघाडामुळे आग लागली?
पंतप्रधान निधीतून मदतीची घोषणा
मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी तातडीने घटनास्थळी भेट देत अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली आणि बचावकार्य वेगाने पार पाडण्याचे निर्देश दिले. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त करत प्रधानमंत्री राष्ट्रीय राहत निधीतून मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 2 लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली. या अपघाताने संपूर्ण देशात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Distressed by the loss of lives due to a mishap in Jaisalmer, Rajasthan. My thoughts are with the affected people and their families during this difficult time. Praying for the speedy recovery of the injured.
An ex-gratia of Rs. 2 lakh from PMNRF would be given to the next of…
— PMO India (@PMOIndia) October 14, 2025






