Diwali 2025 : दिवाळीत दिव्याखाली तांदूळ का ठेवले जातात? जाणून घ्या कारण

Published:
दिव्याखाली तांदूळ ठेवणे ही एक प्राचीन आणि धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व असलेली परंपरा आहे.
Diwali 2025 : दिवाळीत दिव्याखाली तांदूळ का ठेवले जातात? जाणून घ्या कारण

दिवाळीत दिवे लावण्याची परंपरा वर्षानुवर्षे चालत आली आहे. पण हे बऱ्याच जणांना माहित नसेल की दिवा लावताना एक वस्तू फार महत्त्वाची असते जी दिव्याखाली ठेवणे फार महत्त्वाची असते. ही वस्तू समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा आकर्षित करते. दिवाळीमध्ये दिव्याखाली तांदूळ ठेवण्याची प्राचीन परंपरा आहे. याला धार्मिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे. घरामध्ये आनंद, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा पसरते. दिवाळीत दिव्याखाली तांदूळ का ठेवले जातात, जाणून घ्या…

दिवाळीत दिव्याखाली तांदूळ का ठेवले जातात? 

भारतीय संस्कृतीत, तांदूळ हे समृद्धी, आनंद, शांती आणि अन्नाची सतत उपलब्धता यांचे प्रतीक मानले जाते. ते देवी लक्ष्मीचे आवडते देखील मानले जाते, कारण ते दैवी आशीर्वाद आणि समृद्धीचे प्रतीक आहे. घराच्या विविध ठिकाणी आपण दिवे लावतो. परंतु मुख्य पूजास्थळी दिव्याखाली तांदूळ ठेवणे विशेषतः शुभ मानले जाते.

नकारात्मकता दूर होते

दिव्याच्या ज्योतीने प्रकाशित होणारा तांदूळ सकारात्मक ऊर्जा पसरवतो. त्यामुळे घरामधील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि घरामध्ये आनंद, समृद्धी आणि कल्याण आणतो. दिव्याखाली तांदूळ ठेवल्याने घरात आनंदाचे वातावरण निर्माण होते आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते. 

संपत्ती आणि स्थिरता

दिवाळीला दिव्याखाली तांदूळ ठेवणे हे संपत्ती आणि समृद्धीच्या प्राप्तीचे प्रतीक आहे. तांदळाला धान्याचा राजा मानले जाते, जो स्थिरता आणि समृद्धीचे प्रतीक आहे. भारतीय संस्कृतीत तांदूळ हे समृद्धी, आनंद, शांती आणि अन्नाच्या सातत्याचे प्रतीक आहे. त्यामुळे दिव्याखाली तांदूळ ठेवल्याने घरात धन आणि धान्याची भरभराट होते. 

देवी लक्ष्मीची कृपा

तांदूळ हे देवी लक्ष्मीला आवडणारे धान्य आहे असे मानले जाते. त्यामुळे दिव्याखाली तांदूळ ठेवल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि तिचे आशीर्वाद घरात कायम राहतात. देवी लक्ष्मीला तांदूळ प्रिय असल्यामुळे, तिची कृपा घरात राहते.

शुभकार्यांमध्ये तांदळाचे महत्त्व

भारतीय सणांमध्ये तांदूळ नेहमीच शुभ मानला जातो. हिंदू धर्मात, तांदूळ हे शुद्धता आणि देवतेला अर्पण करण्याचे एक महत्त्वाचे प्रतीक आहे. तांदूळ वापरून केलेला अभिषेक दैवी उपस्थिती दर्शवतो. लग्न आणि इतर धार्मिक समारंभांमध्ये तांदूळ सौभाग्य आणि समृद्धीचे प्रतीक म्हणून वापरले जातात. विशेषतः लग्न समारंभांमध्ये ‘अक्षता’ म्हणजे न तुटलेले तांदूळ वापरले जातात, जे अखंड आणि पूर्णत्वाचे प्रतीक आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking  केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking  कोणताही दावा करत नाही.)

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews