गणेशजींच्या पूजेदरम्यान, भक्त त्यांना अनेक वस्तू अर्पण करतात, ज्यामध्ये दुर्वा गवताचे विशेष महत्त्व आहे. असे म्हटले जाते की त्याशिवाय बाप्पाची पूजा अपूर्ण मानली जाते. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की गणेशजींना दुर्वा गवत का अर्पण केले जाते?चला तर मग जाणून घेऊयात गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात…

पौराणिक कथा 

एकदा गणेशाने अनलासुर नावाच्या राक्षसाच्या त्रासातून जगाला वाचवण्यासाठी गणपतीने त्याला गिळंकृत केले, ज्यामुळे त्याच्या पोटात जळजळ होऊ लागली. अनेक उपाय करूनही जेव्हा त्याच्या पोटाची जळजळ कमी झाली नाही, तेव्हा कश्यप ऋषींनी गणेशाला २१ दुर्वांची जुडी खायला दिली. असे म्हटले जाते की दुर्वा खाल्ल्याने गणेशाच्या पोटाची जळजळ कमी झाली. म्हणूनच गणेशाला दुर्वा अर्पण करण्याची परंपरा आहे. दुर्वा अर्पण केल्याने गणपती प्रसन्न होतो, अडथळे दूर होतात आणि घरात सुख-समृद्धी येते असे मानले जाते. 

गणपतीला दुर्वा कशा अर्पण कराव्यात?

  • दुर्वा अर्पण करण्यापूर्वी त्या स्वच्छ पाण्याने धुवाव्यात. 
  • गणपतीला नेहमी २१ दुर्वांची जुडी अर्पण केली जाते. 
  • दुर्वा अर्पण करताना ‘ॐ गं गणपतये नमः दुर्वांकुरान् समर्पयामि’ या मंत्राचा जप करावा. 
  • शास्त्रानुसार, दुर्वा गणपतीच्या डोक्यावर, म्हणजेच शिरसी किंवा कानांजवळ वाहिल्या जातात. 
(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking  केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking  कोणताही दावा करत नाही.)