वास्तुशास्त्रानुसार आणि ज्योतिषशास्त्रानुसार, शनि दोष कमी करण्यासाठी हनुमानाची पूजा करणे हा एक प्रभावी उपाय आहे. धार्मिक मान्यतेनुसार भगवान हनुमानाची पूजा करणाऱ्यांना शनिदेव कधीही त्रास देत नाहीत. यामागचे कारण काय आहे? पौराणिक कथा जाणून घ्या..
पौराणिक कथा
पौराणिक कथेनुसार त्रेतायुगातील रामायण काळातील आहे. जेव्हा रावणाने देवी सीता यांचे अपहरण करून तिला लंकेत नेले होते, तेव्हा रामाच्या आज्ञेवरून हनुमान देवी सीतेच्या शोधात लंकेत पोहोचले. हनुमान जेव्हा लंकेत पोहोचले, तेव्हा त्यांनी पाहिले की, रावणाने शनिदेवाला आधीच कैद करून ठेवले होते. त्यावेळी हनुमान देवी सीतेला सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत. कारण देवी सीता म्हणाली की, जेव्हा भगवान श्रीराम तिला न्यायला येतील तेव्हाच ती त्यांच्यासोबत जाईल. पण हनुमानानी शनिदेवाची मदत करून त्यांना रावणाच्या तुरुंगातून बाहेर काढले. जेव्हा हनुमानानी शनिदेवाची मदत केली, तेव्हा ते खूप आनंदी झाले आणि त्यांनी हनुमानजींना त्या बदल्यात काही वरदान मागायला सांगितले.
तेव्हा हनुमान म्हणाले – जो भक्त माझी भक्तिभावाने पूजा करतो, त्याला तू कधीही शिक्षा करणार नाहीस. त्यांच्या वचनानुसार शनिदेवाने हनुमानजींना होकार दिला. शनिदेवाने प्रसन्न होऊन हनुमानाला आणि त्याच्या भक्तांना त्रास न देण्याचे वचन दिले. यानंतर शनिदेवाच्या पूजेसोबतच शनिवारी हनुमानाची पूजा होऊ लागली.
शनिदोष कमी होतो
वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रानुसार, शनिवारी हनुमान मंदिरात जाऊन पूजा केल्याने शनि दोष कमी होतो, मानसिक बळ मिळते आणि जीवनातील अडथळे दूर होतात कारण हनुमानाची उपासना केल्याने शनिदेवाचा कोप कमी होतो आणि त्यांची कृपा प्राप्त होते; यासाठी शनिवारी हनुमान मंदिरात जाऊन हनुमान चालीसा पठण करणे आणि तेल अर्पण करणे यांसारखे उपाय सांगितले जातात, ज्यामुळे शनिदेवासोबत बजरंगबलीचीही कृपा मिळते.
(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)





