Marathi News

Religion : शिवलिंगावर दह्याचा अभिषेक केल्याने, सर्व त्रास दूर होतात…

Published:
शिवपुराणानुसार, शिवलिंगावर दह्याचा अभिषेक करणे अत्यंत शुभ मानले जाते आणि यामुळे महादेव लवकर प्रसन्न होतात. दह्याने अभिषेक केल्याने भक्ताच्या जीवनातील सुख, समृद्धी आणि स्थिरता वाढते, तसेच आरोग्य उत्तम राहते आणि संकटे दूर होतात.
Religion : शिवलिंगावर दह्याचा अभिषेक केल्याने, सर्व त्रास दूर होतात…
हिंदू धर्मात भगवान शिवाची उपासना करताना ‘अभिषेकाला’ अनन्यसाधारण महत्त्व आहे. महादेवाला भोळा आणि लवकर प्रसन्न होणारा देव म्हटले जाते. भगवान शिवाचे रूप म्हणून शिवलिंगाची पूजा केली जाते. शिवलिंगावर पाणी, गंगाजल, फळे, फुले, दूध, भांग, बेलपत्र, चंदन, धतुरा, तूप, दही, अक्षता, मध किंवा तुपाचा अभिषेक करतात. शिवलिंगावर काही विशेष पदार्थ अर्पण केल्याने पापांपासून मुक्ती मिळते आणि जीवनातील समस्या कमी होऊ लागतात. शिवलिंगावर दह्याचा अभिषेक केल्याने खरचं महादेव,प्रसन्न होतात का? चला तर मग याबद्दल जाणून घेऊयात…

शिवलिंगावर दह्याचा अभिषेक केल्याने महादेव प्रसन्न होतात का?

वास्तुशास्त्र आणि शिवपुराणानुसार, शिवलिंगावर दह्याचा अभिषेक करणे अत्यंत शुभ मानले जाते, ज्यामुळे महादेव प्रसन्न होतात. या उपायामुळे भक्तांच्या जीवनातील आरोग्य समस्या दूर होतात आणि आर्थिक अडचणी दूर होऊन सुख-समृद्धी प्राप्त होते. ज्यामुळे मानसिक शांतता, कौटुंबिक सुख आणि आर्थिक समृद्धी मिळते. हा उपाय विशेषतः सोमवारी केल्यास कुंडलीतील चंद्रदोष दूर होण्यास, रागीट स्वभाव शांत होण्यास आणि नात्यांमधील कटुता कमी होऊन प्रेम वाढण्यास मदत होते. 

सुख-समृद्धी

दह्याचा अभिषेक केल्याने घरात सुख-शांती आणि आर्थिक भरभराट येते. सुखी वैवाहिक जीवनासाठी आणि आनंदासाठी दह्याचा अभिषेक प्रभावी मानला जातो. दही शिवाला अत्यंत प्रिय असून, या उपायाने मानसिक शांती, आरोग्य आणि घरात सुख-समृद्धी येते.

आरोग्य प्राप्ती

दह्याने अभिषेक केल्याने शारीरिक त्रास, आजारपण दूर होते आणि उत्तम आरोग्य लाभते. दही अर्पण केल्याने शारीरिक व्याधी आणि आजारांपासून मुक्ती मिळते. दही थंड असल्याने ते महादेवाच्या उग्र रूपाला शांत करते, ज्यामुळे आरोग्याच्या समस्याही कमी होतात. 

अडकलेली कामे

आर्थिक समस्या किंवा कामात वारंवार येणारे अडथळे दूर करण्यासाठी सोमवारी किंवा प्रदोष काळात दह्याचा अभिषेक फायदेशीर ठरतो.  दह्याभिषेकामुळे घरातील आर्थिक अडचणी दूर होऊन धनवृद्धी होते आणि अडकलेली कामे पूर्ण होण्यास मदत होते, अशी श्रद्धा आहे. दही अर्पण केल्याने अडकलेली कामे मार्गी लागतात आणि व्यवसायात प्रगती होते.

मानसिक शांतता

धार्मिक मान्यतांनुसार, शिवलिंगावर दही अर्पण केल्याने मानसिक शांतता मिळते, राग कमी होतो आणि जीवनातील संकटे दूर होण्यास मदत होते. दही शीतलता प्रदान करते, ज्यामुळे मानसिक ताण आणि चिडचिडेपणा कमी होतो, तसेच कुंडलीतील चंद्र दोष दूर होतो. विशेषतः सोमवारी हा उपाय करणे अत्यंत शुभ मानले जाते. दह्याची प्रकृती थंड असल्याने ते राग आणि मानसिक तणाव कमी करण्यास मदत करते. दही थंड तासीरचे असल्याने, ते महादेवावर चढवल्याने मनाची गर्मी आणि चिडचिडेपणा कमी होऊन मानसिक शांतता मिळते.

कौटुंबिक सुख

कुटुंबात प्रेम आणि गोडवा वाढवण्यासाठी, तसेच नवरा-बायकोमधील भांडणे दूर करण्यासाठी शिवलिंगावर दह्याचा अभिषेक केला जातो. ज्या घरांमध्ये सदस्यांमध्ये सतत मतभेद होतात, त्यांनी दही अर्पण केल्यास घरातील वातावरण शांत होते आणि नात्यात गोडवा निर्माण होतो.

दही अर्पण करण्याची योग्य पद्धत

सकाळी स्नान केल्यानंतर स्वच्छ मनाने शिवलिंगावर थोडे दही अर्पण करावे आणि त्यानंतर शुद्ध जल अर्पण करावे. ‘ॐ नमः शिवाय’ मंत्राचा जप करत दही अर्पण करावे. हा उपाय विशेषतः सोमवारी करणे अधिक फलदायी मानले जाते.

(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews