Garud Puran : महिला अंत्यसंस्कार करू शकतात का? गरुड पुराण काय सांगते जाणून घ्या

Published:
अनेक आधुनिक विचारवंत आणि तज्ज्ञांच्या मते, स्त्रिया अंत्यसंस्कार करू शकतात, विशेषतः जेव्हा पुरुष वारसदार उपलब्ध नसतात किंवा भावनिक परिस्थिती असते. हा निर्णय व्यक्तीच्या भावना आणि जबाबदारीवर अवलंबून आहे.
Garud Puran : महिला अंत्यसंस्कार करू शकतात का? गरुड पुराण काय सांगते जाणून घ्या

हिंदू धर्मातील लोकांसाठी गरुड पुराणाचे ज्ञान अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. जीवन आणि मृत्यूच्या समतोलाचे स्पष्टीकरण गरुड पुराणातही आढळते. भगवान विष्णू हे या पुराणाचे देवता मानले जातात. हिंदू धर्मात अंत्यसंस्काराबाबतही अनेक समजुती आहेत. महिला अंत्यसंस्कार करू शकतात का? चला तर मग याबद्दल जाणून घेऊयात…

परंपरेनुसार

हिंदू धर्मात अंत्यसंस्कार (सोळावा संस्कार) करण्याची जबाबदारी प्रामुख्याने मुलाची किंवा कुटुंबातील पुरुष सदस्याची असते, असे मानले जाते. अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी मुलाची (विशेषतः मोठा मुलगा) असते, अशी रूढिवादी धारणा आहे. स्त्रियांना भावनिकदृष्ट्या दुर्बळ मानले जाते आणि त्यामुळे त्यांना अंत्यसंस्कारांपासून दूर ठेवले जाते.

गरुड पुराणानुसार

गरुड पुराणानुसार, मृत व्यक्तीचा आत्मा शांत होण्यासाठी आणि मोक्ष मिळवण्यासाठी अंतिम संस्कार आवश्यक आहे. जेव्हा कुटुंबात पुरुष सदस्य नसतात, तेव्हा स्त्रिया, जसे की पत्नी, मुलगी किंवा इतर नातेवाईक, हे संस्कार करू शकतात. मृत व्यक्तीचा अंतिम संस्कार करण्याचा अधिकार प्रामुख्याने पुत्राला असतो. जर पुत्र नसेल, तर नातू, धाकटा भाऊ किंवा त्याच्या कुटुंबातील पुरुष सदस्याने हा विधी करावा. महिलांना अंत्यसंस्कार करण्यापासून परावृत्त करण्यामागे काही रूढी आणि समजुती आहेत, पण गरुड पुराणासारख्या ग्रंथांमध्ये स्त्रियांनाही हा अधिकार असल्याचे सांगितले आहे. पारंपरिक रूढींपेक्षा धार्मिक ग्रंथांचे आणि बदलत्या सामाजिक गरजांचे पालन करून महिला अंत्यसंस्कार करू शकतात.

महिलांना अधिकार कधी मिळतो?

शास्त्रानुसार महिला अंत्यसंस्कार करू शकतात. गरुड पुराणानुसार, पुरुष सदस्य नसतील तर पत्नी, मुलगी किंवा बहीण अंतिम संस्कार करू शकतात, कारण ही एक सामाजिक प्रथा आहे, धार्मिक बंधन नाही.. गरुड पुराण स्पष्ट करते की जेव्हा कुटुंबात कोणताही पुरुष सदस्य नसेल, तेव्हा स्त्रियांना अंतिम संस्कार करण्याची परवानगी आहे.

आधुनिक काळात काय बदल झाले आहेत?

बदलत्या काळानुसार : सध्याच्या काळात अनेक ठिकाणी मुली आणि जावई देखील अंत्यसंस्कार करत आहेत, जे सामाजिक दृष्टिकोन बदलत असल्याचे दर्शवते.

धार्मिक शिकवण : गरुड पुराणासारख्या ग्रंथांमधील शिकवणीनुसार, हा भ्रम दूर करण्याची आणि शास्त्रांचे पालन करण्याची गरज आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking  केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking  कोणताही दावा करत नाही.)