Hanuman Chalisa : हनुमान चालिसा दिवसातून किती वेळा वाचावी? जाणून घ्या…

Published:
हनुमान चालीसा पठण हे केवळ आध्यात्मिकच नाही तर वास्तुशास्त्राच्या दृष्टीनेही फायदेशीर मानले जाते, कारण यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते, अडथळे दूर होतात आणि हनुमानाची कृपा लाभते, ज्यामुळे घरात सुख-शांती नांदते.
Hanuman Chalisa : हनुमान चालिसा दिवसातून किती वेळा वाचावी? जाणून घ्या…

हनुमान चालिसा पठणाचे विशेष महत्त्व आहे. मंगळवार आणि शनिवार हनुमानासाठी खास दिवस मानले जातात. या दिवशी लोक संकटांपासून मुक्त होण्यासाठी हनुमान चालिसाचे पठण करतात. हनुमान चालिसा दिवसातून किती वेळा पठण करावी, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, चला तर मग याबद्दल जाणून घेऊयात…

दिवसातून किती वेळा हनुमान चालिसा वाचावी?

मंगळवार आणि शनिवार हे दिवस हनुमान चालीसा पठणासाठी उत्तम आहेत. सकाळ किंवा संध्याकाळची वेळ चांगली मानली जाते. वास्तुशास्त्रानुसार मंगळवारी हनुमान चालीसा सात वेळा पठण करणे अत्यंत शुभ मानले जाते, ज्यामुळे अडथळे दूर होतात आणि हनुमानजींची कृपा मिळते; तुम्ही लाल आसनावर बसून सकाळी किंवा संध्याकाळी हे पठण करू शकता. सात वेळा पठण करणे शुभ असते. काही जण ११, २१, ५१ किंवा १०८ वेळा देखील करतात, पण सात वेळा करणे सामान्य आणि प्रभावी मानले जाते.

हनुमान चालीसा पठणाचे फायदे

हनुमान चालीसा पठण केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा संचारते, नकारात्मक शक्ती दूर होतात, मानसिक शांती मिळते, आत्मविश्वास वाढतो, आरोग्य सुधारते आणि सर्व अडथळे दूर होऊन सुख-समृद्धी येते. शनिदोषासारख्या ग्रहदोष आणि वाईट शक्तींपासून संरक्षण मिळते. बुद्धी आणि कुशाग्रता प्राप्त होते, ज्यामुळे जीवनातील सर्व क्षेत्रांमध्ये यश मिळते. सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि समस्या दूर होतात. पठणामुळे आंतरिक शक्ती वाढते आणि जीवनातील अडथळे पार करण्यासाठी आत्मविश्वास मिळतो.

पठण करण्याची पद्धत

  • सकाळ किंवा संध्याकाळची वेळ उत्तम. मंगळवार आणि शनिवार हे दिवस विशेष मानले जातात.
  • स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करा.
  • स्वच्छ आणि शांत ठिकाणी बसा, शक्यतो हनुमानजींच्या मूर्तीसमोर.
  • शक्य असल्यास पूर्वेकडे तोंड करून बसावे.
  • लाल रंगाच्या आसनावर बसावे.
  •  ७ वेळा (किंवा ११, २१, १०८ वेळा) पठण करणे फलदायी मानले जाते.
  • पठण सुरू करण्यापूर्वी ‘ॐ नमो हनुमते नमः’ या मंत्राचा जप करावा.
  • पठण झाल्यावर देवाला फुले, अक्षता आणि गूळ-चणे अर्पण करावेत.
  • हनुमानजींना नैवेद्य दाखवून, सर्वांना प्रसाद वाटावा. 
  • शुद्ध तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावणे शुभ मानले जाते. 

(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews