माघी गणेश जयंती असो वा गणेशोत्सव, पंचखाद्य हा कोकणातील एक पारंपरिक आणि पौष्टिक प्रसाद आहे, जो केवळ नैवेद्य नसून सहभोजन, एकोपा आणि परंपरेचा गोडवा टिकवणारा आहे. काजू, सुकं खोबरं, चणा डाळ, शेंगदाणे, लाह्या यांसारख्या पदार्थांपासून बनणारा हा प्रसाद आरतीनंतर भक्तांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतो, जो टिकाऊ आणि आरोग्यदायी असल्याने त्याला विशेष महत्त्व आहे.
साहित्य
- काजू – १ कप
- सुकं खोबरं – १ कप
- चणा डाळ – १ कप
- शेंगदाणे – १ कप
- लाह्या – ३ ते ४ कप
- गूळ – १ कप
- पाणी – गरजेनुसार
- वेलची पूड – अर्धा चमचा
कृती
- सर्वप्रथम कढई गरम करून त्यात काजू, सुकं खोबरं, चणा डाळ आणि शेंगदाणे हे पदार्थ कोरडे भाजून घ्यावेत.
- एका पातेल्यात गूळ आणि पाणी घालून एकतारी पाक तयार करावा.
- त्या पाकात भाजलेले सर्व जिन्नस व वेलची पूड मिसळावी.
- शेवटी त्यात लाह्या घालून सर्व मिश्रण नीट हलवून घ्यावे.
- अशा रीतीने तुमचा पौष्टिक आणि पारंपरिक पंचखाद्य तयार आहे, जो बाप्पाच्या नैवेद्यासाठी आणि प्रसादासाठी उत्तम आहे.
(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)






