Makar Sankranti 2026 : मकर संक्रांतीला तिळाचे लाडू का बनवले जातात? जाणून घ्या यामागील पौराणिक कथा…

Published:
तिळगुळाची परंपरा ही हिवाळ्यातील ऊर्जेची गरज, नाती जपण्याचा संदेश आणि धार्मिक श्रद्धा यांचा मिलाफ आहे, जी पिढ्यानपिढ्या चालत आली आहे.
Makar Sankranti 2026 : मकर संक्रांतीला तिळाचे लाडू का बनवले जातात? जाणून घ्या यामागील पौराणिक कथा…

मकर संक्रांतीच्या दिवशी सर्वजण तिळगुळ वाटून हा सण साजरा करतात. तिळाची पोळी, तिळाच्या वड्या यादिवशी सर्वजण खातात. मात्र संक्रांतीला तिळाचे इतके महत्व का आहे? यामागील पौराणिक कथा काय आहे चला तर मग जाणून घेऊयात…

पौराणिक कथा

पौराणिक कथेनुसार सूर्यदेव पुत्र शनिदेवावर खूप संतापले होते. त्यांनी रागाच्या भरात कुंभ राशीतील शनिदेवाचे घर (शनिचे निवासस्थान) जाळून टाकले. त्यामुळे सूर्यदेव नाराज झाले. त्यानंतर शनिदेवाने माफी मागितल्यानंतर सूर्यदेवाचा राग शांत झाला.  त्यांचा राग शांत करण्यासाठी शनिदेवाने तिळाने (तिळ) पूजा केली. यामुळे सूर्यदेव प्रसन्न झाले आणि त्यांनी शनिदेवाला वरदान दिले की, जेव्हा सूर्यदेव मकर राशीत प्रवेश करतील, तेव्हा शनिदेवाच्या घरी समृद्धी आणि आनंद नांदेल. शनिदेवाच्या या पूजेने सूर्यदेव प्रसन्न झाले आणि तेव्हापासून सूर्यदेव मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांती साजरी करण्यात येते आणि तेव्हापासून तिळगुळाचे लाडू बनवण्याची प्रथा सुरु झाली. यामुळेच मकर संक्रांतीच्या दिवशी तिळाचे विशेष महत्त्व मानले जाते.

तीळ-गुळाचे महत्त्व काय?

पद्म पुराणानुसार, भगवान विष्णूंच्या घामातून तिळाची उत्पत्ती झाली. विष्णूंनी तिळाला मोक्ष देणारे धान्य म्हणून वरदान दिले, म्हणून तिळ-गुळाचे सेवन धार्मिक विधींमध्ये महत्त्वाचे मानले जाते. 

मकर संक्रांती हा शेतीचा सण असल्याने, पिकलेल्या तिळाचा वापर करून हा उत्सव साजरा केला जातो, जो समृद्धीचे प्रतीक आहे.  मकर संक्रांती हिवाळ्यात येते. तीळ आणि गूळ उष्ण पदार्थ असल्याने शरीराला ऊर्जा आणि उष्णता देतात, ज्यामुळे थंडीत संरक्षण मिळते. “तीळगूळ घ्या, गोड गोड बोला” या म्हणीतून नात्यांमधील कटुता विसरून मैत्री आणि प्रेमाचे संबंध दृढ करण्याचा संदेश दिला जातो. हे तिळगुळाचे सर्वात महत्त्वाचे सामाजिक कारण आहे.

(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking  केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking  कोणताही दावा करत नाही.)
Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews