हिंदू धर्मात पौष पौर्णिमेला धार्मिकदृष्ट्या खूप महत्त्व आहे. या दिवशी व्रत, स्नान आणि दान केल्याने पापांचा नाश होतो आणि आयुष्यात सुख-समृद्धी येते, अशी श्रद्धा आहे. यावर्षी पौष पौर्णिमा कधी आहे? काय आहे पौष पौर्णिमेच महत्व जाणून घेऊयात…
कधी आहे पौष पौर्णिमा ?
पौष पौर्णिमेचे धार्मिक महत्त्व
पौष पौर्णिमा या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याने अक्षय पुण्य मिळते आणि पापांचा नाश होतो, अशी श्रद्धा आहे. या दिवशी गंगा, यमुना यांसारख्या पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याने जन्मा-जन्माची पापे नष्ट होतात, अशी मान्यता आहे. घरी स्नान करताना पाण्यात गंगेजल मिसळले जाते. या दिवशी भगवान विष्णू आणि लक्ष्मीची पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात. या पौर्णिमेला शाकंभरी देवीची पूजा केली जाते, जी अन्नदात्री देवी म्हणून ओळखली जाते. पौष पौर्णिमेपासून माघ महिन्यातील पवित्र स्नानाची सुरुवात होते, जे अत्यंत फलदायी मानले जाते. पौष महिना सूर्यदेवाला समर्पित असल्याने, पौर्णिमेच्या दिवशी सूर्य आणि चंद्र देवतेची पूजा केल्याने विशेष फळ मिळते. पौष पौर्णिमेपासून माघ महिन्याची सुरुवात होते, जो आध्यात्मिक विकासासाठी महत्त्वाचा मानला जातो. या काळात प्रयागराजच्या संगमावर कल्पवास केला जातो.
पूजेची पद्धत
- ब्रह्म मुहूर्तावर उठून पवित्र नदीत स्नान करा. शक्य नसल्यास, पाण्यामध्ये गंगाजल मिसळून स्नान करा.
- स्नानानंतर सूर्यमंत्राचा जप करत सूर्यदेवाला अर्घ्य द्या.
- भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करा. त्यांना नैवेद्य दाखवा.
- या दिवशी सत्यनारायण पूजा करणे शुभ मानले जाते.
- भगवान सत्यनारायणाची विधिवत पूजा करून फुले, फळे, मिठाई, पंचामृत आणि नैवेद्य अर्पण करा.
- यानंतर भगवान सत्यनारायणाची कथा ऐका किंवा वाचा.
- गरजू लोकांना अन्न, वस्त्र, धान्य दान करा. या दिवशी केलेले दान अनेक पटीने फळ देते, अशी श्रद्धा आहे. पौर्णिमेच्या दिवशी दान केल्याने अश्वमेध यज्ञाप्रमाणेच फळ मिळते.
- या दिवशी उपवास केला जातो आणि जप-तप केले जाते.
(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)






