Marathi News

Vastu Tips : वास्तुदोष दूर करण्यासाठी कापराचे करा ‘हे’ उपाय, घरात येईल सुख, समृद्धी…

Published:
अनेक ग्रहदोष आणि वास्तूदोष दूर करण्यासाठी कापूरचे काही उपाय केल्याने खूप चांगले परिणाम मिळतात. याशिवाय घरातील काही खास ठिकाणी कापूर ठेवल्याने अनेक फायदे होतात.
Vastu Tips : वास्तुदोष दूर करण्यासाठी कापराचे करा ‘हे’ उपाय, घरात येईल सुख, समृद्धी…

ज्योतिषशास्त्रात कापूरशी संबंधित अनेक उपाय सांगण्यात आले आहेत, ज्यामुळे घरात सकारात्मकता येते, राहू-केतू दोषांपासून मुक्ति मिळते आणि घरात सुख-समृद्धी नांदते. कापराशी संबंधित या उपायांबद्दल जाणून घेऊया…

सकारात्मक ऊर्जा आणि वास्तुदोष निवारणासाठी

कापूर हा वास्तुशास्त्रानुसार एक प्रभावी उपाय मानला जातो, जो नकारात्मक ऊर्जा शोषून घेतो आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो. रोज सकाळी किंवा संध्याकाळी पूजा करताना कापूर जाळा आणि त्याचा धूर घरात पसरावा. यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मकता येते. घरातील कोपऱ्यांमध्ये कापराच्या वड्या ठेवाव्यात, जेणेकरून वास्तूतील दोष कमी होतील. कापूर विरघळल्यावर पुन्हा नवीन कापूर ठेवावा, यामुळे घरात सुख-समृद्धी राहते. या उपायांमुळे घरात आनंद, सुख-समृद्धी येते आणि पैशांशी संबंधित अडचणी दूर होतात, असे ज्योतिषशास्त्र सांगते. 

आर्थिक भरभराटीसाठी

रात्री झोपण्यापूर्वी चांदीच्या वाटीत लवंग आणि कापूर एकत्र करून जाळा. याचा धूर घरात पसरवावा. यामुळे पैशांची चणचण दूर होऊन घरात धनलाभ होतो, असे मानले जाते. कापूर जाळल्याने ग्रह दोष आणि वास्तुदोष दूर होऊन आर्थिक समस्या कमी होतात. कापूर लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते आणि ते घरात संपत्ती व स्थिरता आणण्यास मदत करते, असेही म्हटले जाते.

नकारात्मक ऊर्जा आणि वास्तुदोष दूर करण्यासाठी

कापूर जाळणे हा वास्तुदोष, नकारात्मक ऊर्जा आणि आर्थिक समस्या दूर करण्याचा एक सोपा आणि प्रभावी मार्ग मानला जातो. पूजा आणि इतर धार्मिक विधींमध्ये त्याचा वापर केल्याने घरात सकारात्मक वातावरण निर्माण होते आणि सुख-समृद्धी येते, असे मानले जाते.  एका भांड्यात कापूर घेऊन घरातील वास्तुदोष असलेल्या ठिकाणी ठेवा. कापूर संपल्यावर नवीन ठेवा. हा उपाय काही दिवस करा. रोज सकाळी आणि संध्याकाळी देशी तुपात बुडवून कापूर जाळा, त्याचा सुगंध घरात पसरू द्या. यामुळे नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते, असे म्हटले जाते. घराच्या आग्नेय कोपऱ्यात कापूर जाळल्याने नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि सकारात्मकता येते.

ग्रह दोष आणि पितृदोषासाठी

सकाळी, संध्याकाळी आणि रात्री तीन वेळा कापूर जाळल्याने जन्मकुंडलीतील पितृदोष किंवा कालसर्प दोष दूर होण्यास मदत होते. ज्योतिषशास्त्रानुसार, राहू-केतूमुळे होणाऱ्या कालसर्प दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी आणि पितृदोषाच्या त्रासातून बाहेर पडण्यासाठी, दिवसातून तीन वेळा (सकाळी, संध्याकाळी आणि रात्री) कापूर जाळणे उपयुक्त ठरू शकते.

(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking  केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking  कोणताही दावा करत नाही.)

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews