Marathi News

Vastu Tips : घरात वास्तुदोष निर्माण होऊ नये, यासाठी काय काळजी घ्यावी? जाणून घ्या…

Published:
वास्तुशास्त्रात नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी घराची योग्य रचना आणि स्वच्छता अत्यंत महत्त्वाची आहे. वास्तुदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी मुख्य दरवाजाची अस्वच्छता, चुकीच्या दिशेला जड वस्तू ठेवणे, स्वयंपाकघरातील दोष, बंद घड्याळे आणि तुटलेली काच या चुका आवर्जून टाळल्या पाहिजेत, ज्यामुळे सुख-समृद्धी टिकून राहील.
Vastu Tips : घरात वास्तुदोष निर्माण होऊ नये, यासाठी काय काळजी घ्यावी? जाणून घ्या…

हिंदू धर्मशास्त्रामध्ये वास्तुशास्त्राला प्रचंड महत्त्व आहे, जेव्हा तुमच्या घरात वास्तुदोष निर्माण होतो, तेव्हा घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते, या नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव हा तुमच्यासह तुमच्या कुटुंबावर पडतो, आणि अनेक समस्या निर्माण होतात, वास्तुदोष निर्माण होऊ नये, यासाठी काय काळजी घ्यावी? चला तर मग याबद्दल जाणून घेऊयात…

मुख्य दरवाजाजवळ अस्वच्छता

मुख्य द्वार हे ऊर्जेचे प्रवेशद्वार मानले जाते. दरवाजासमोर कचरा, जोडे किंवा अडथळे ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा येते. वास्तुशास्त्रात मुख्य द्वार हे सकारात्मक ऊर्जेचे प्रवेशद्वार मानले जाते. या ठिकाणी कचरा, जोडे किंवा अडथळे ठेवल्यास नकारात्मक ऊर्जा वाढून घरात वास्तुदोष निर्माण होतात, ज्यामुळे सुख-समृद्धीला बाधा येते. मुख्य द्वार नेहमी स्वच्छ, प्रसन्न आणि प्रकाशाने युक्त असावे, जेणेकरून सुदैव आणि प्रगती घरात प्रवेश करेल.

खरकटी भांडी

वास्तुशास्त्रानुसार, रात्री खरकटी भांडी सिंकमध्ये किंवा किचनमध्ये तशीच ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा वाढते, ज्यामुळे आर्थिक संकट, दारिद्र्य आणि कुटुंबात कलह निर्माण होऊ शकतो.  रात्री स्वयंपाकघरात खरकटी भांडी ठेवल्याने राहू-केतूचा प्रभाव वाढतो, ज्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. वास्तुशास्त्रानुसार, किचनमध्ये घाणेरडी भांडी राहिल्याने देवी लक्ष्मी रुष्ट होते, ज्यामुळे पैशांची कमतरता आणि करिअरमध्ये अडथळे येतात.वास्तुदोष दूर करण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी भांडी स्वच्छ करून सिंक रिकामे ठेवावे आणि किचनची जागा पुसून स्वच्छ करावी.

पूर्वजांचे फोटो

वास्तुशास्त्रानुसार पूर्वजांचे (पितरांचे) फोटो चुकीच्या दिशेला लावल्यास वास्तू दोष निर्माण होऊन जीवनात नकारात्मकता येते. पितरांचे फोटो नेहमी दक्षिण दिशेच्या भिंतीवर लावावेत, जेणेकरून त्यांची नजर उत्तर दिशेकडे असेल. यामुळे घरात सुख-शांती व स्थिरता राहते आणि पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतो.

सायंकाळचे नियम

वास्तुशास्त्रानुसार, सुख-समृद्धी टिकवून ठेवण्यासाठी आणि वास्तुदोष टाळण्यासाठी, सायंकाळच्या वेळी मीठ किंवा कात यांसारख्या गोष्टी कोणालाही देऊ नयेत. याव्यतिरिक्त, संध्याकाळी चुकूनही झोपू नये, कारण यामुळे घरात नकारात्मकता निर्माण होते आणि वास्तुदोष वाढतात. हे टाळल्यास घरातील सकारात्मक ऊर्जा टिकून राहते.

देवघर

वास्तुशास्त्रानुसार देवघर आणि किचन जवळ असणे गंभीर वास्तुदोष निर्माण करते, कारण यामुळे किचनमधील उष्णता आणि देवघरातील सकारात्मक ऊर्जा यांचा संघर्ष होऊन नकारात्मकता वाढते.

(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews