Tulsi Mala : वारकरी तुळशीची माळ गळ्यात का घालतात ? माळ घालण्याचे नियम जाणून घ्या…

Published:
हिंदू धर्मामध्ये तुळशीच्या माळेला पवित्र मानलं गेलं आहे. तुळशीची माळ ही वारकऱ्यांसाठी केवळ एक दागिना नसून, ती त्यांची निष्ठा, भक्ती आणि परमेश्वराशी जोडलेली एक आध्यात्मिक ओळख आहे.
Tulsi Mala : वारकरी तुळशीची माळ गळ्यात का घालतात ? माळ घालण्याचे नियम जाणून घ्या…

हिंदू धर्मामध्ये तुळशीला पवित्र मानलं जातं, अनेक जण तुळशीची माळ आपल्या गळ्यात घालतात, मात्र तुळशीची माळ गळ्यात घातल्यानंतर काही नियमांचं पालन करावं लागतं, चला तर मग याबद्दल जाणून घेऊयात…

वारकरी तुळशीची माळ गळ्यात का घालतात ?

वारकरी तुळशीची माळ गळ्यात घालतात कारण ती भगवंताशी एकरूपता, भक्तीचे प्रतीक आणि आध्यात्मिक ओळख आहे. आयुष्यातील कर्तव्ये पार पाडताना देवाचे नाव विसरू नये म्हणून ही माळ गळ्यात असते. तुकोबारायांच्या अभंगातही याचा उल्लेख आहे की, “तुळशी माळा गळा गोपीचंदन टिळा”. तुळशीची माळ ही वारकरी संप्रदायाची आणि वैष्णव भक्तांची एक महत्त्वाची ओळख आहे, जणू ती देवाचा आशीर्वादच आहे. तुळस ही एक पवित्र वनस्पती असून, विठ्ठलाला ती अत्यंत प्रिय आहे, असे मानले जाते. यामुळेच वारकरी माळ घालतात. तुळशीच्या औषधी गुणधर्मांमुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते, रक्तदाब नियंत्रित राहतो आणि मानसिक शांती मिळते असे मानले जाते. 

तुळशीच्या माळेचे महत्त्व

हिंदू धर्मात तुळस पवित्र मानली जाते आणि भगवान विष्णूची प्रिय वनस्पती आहे, त्यामुळे तुळशीची माळ धारण केल्याने आध्यात्मिक संबंध दृढ होतो. तुळस ही लक्ष्मीचे रूप मानली जाते आणि तुळशीच्या माळेने जप केल्यास भगवान विष्णू लवकर प्रसन्न होतात, अशी श्रद्धा आहे. यामुळे मन शांत राहते, सकारात्मक ऊर्जा संचारते आणि कुंडलीतील बुध व गुरु ग्रह बलवान होतात. यामुळे घरात सुख, समृद्धी येते आणि सकारात्मक ऊर्जा संचारते, तसेच नकारात्मक शक्तींपासून संरक्षण मिळते, असे मानले जाते.

तुळशीची माळ गळ्यात घालण्याचे नियम काय?

  • माळ घालण्यापूर्वी गंगाजलाने धुवून घ्यावी आणि स्वच्छ हातांनी स्पर्श करावा. शारीरिक व मानसिक शुद्धता महत्त्वाची आहे.
  • माळ घातल्यावर मांसाहार, मद्यपान टाळावे. लसूण आणि कांदा खाऊ नये.
  • तुळशीच्या माळेचा आदर करावा आणि तिचा वापर केवळ जप व ध्यानासाठी करावा, फॅशन म्हणून करू नये.
  • माळ घातल्यानंतर शरीर आणि मनाची शुद्धता राखावी. माळेला स्वच्छ ठेवावे.
  • खोटे बोलणे, फसवणूक करणे, जुगार खेळणे यांसारख्या वाईट सवयींपासून दूर राहावे.
  • तुळशीची माळ घालून अशा ठिकाणी जाऊ नये जिथे नकारात्मकता असेल किंवा जिथे अशुद्ध वातावरण असेल.
  • जप करण्यासाठी वापरलेली माळ आणि गळ्यात घालण्यासाठीची माळ वेगळी असावी, असे ज्योतिषशास्त्र सांगते.
  • माळ घातल्यावर मनात नकारात्मक विचार येऊ देऊ नयेत, असे मानले जाते. 
  • तुळशीच्या माळेचा आदर करावा आणि तिची पवित्रता जपावी.

(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking  केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking  कोणताही दावा करत नाही.)

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews