Dussehra 2025 : नवरात्रीत देवीसमोर ठेवलेल्या कलशातल्या नारळाचे काय करावे? या गोष्टी लक्षात ठेवा

Published:
शारदीय नवरात्र संपल्यानंतर कलशाचे काय करावे ते जाणून घ्या...
Dussehra 2025 : नवरात्रीत देवीसमोर ठेवलेल्या कलशातल्या नारळाचे काय करावे? या गोष्टी लक्षात ठेवा

कलश ज्या श्रद्धेने स्थापित केला जातो त्याच श्रद्धेने विसर्जन आवश्यक आहे. जर तुम्ही नारळ काढले किंवा चुकीच्या पद्धतीने वापरले तर त्याचा अपमान होतो आणि नवरात्रीमध्ये केलेल्या पूजा आणि उपवासाचे फळ मिळत नाही. जाणून घेऊया नवरात्रीनंतर कलशात ठेवलेल्या नारळाचे काय करावे?

कलशात ठेवलेल्या नारळाचे काय करायचे?

पूजेच्या ठिकाणी ठेवा

कलशावर ठेवलेल्या नारळावर देवीचा विशेष आशीर्वाद असतो. अशा स्थितीत नवरात्रीनंतर हा नारळ लाल रंगाच्या कपड्यात गुंडाळून पूजेच्या ठिकाणी ठेवावा. असे केल्याने देवी प्रसन्न होते आणि भक्ताच्या मनोकामना पूर्ण करते. नारळ लाल कापडात बांधून देवघरात किंवा मंदिरात ठेवल्यास देवीचा आशीर्वाद घरात राहतो.

प्रसाद म्हणून खाणे

नवरात्रीमध्ये कलशावर ठेवलेला नारळ 9 दिवसांनी विधीनुसार काढून टाकावा. यानंतर तुम्ही ते नदी किंवा वाहत्या पाण्यात विसर्जीत करू शकता किंवा  प्रसाद म्हणून वाटून स्वतः देखील खाऊ शकता. नवरात्रीनंतर नारळ कुटुंबातील सदस्यांना आणि आसपासच्या लोकांना प्रसाद म्हणून वाटणे अत्यंत शुभ मानले जाते. नारळापासून पौष्टिक खीर किंवा लाडू बनवून नैवेद्य म्हणून देवीला अर्पण करू शकता किंवा खाऊ शकता. असे केल्याने तुम्हाला देवीकडून सुख आणि समृद्धीचा आशिर्वाद प्राप्त होईल.

पेरांमध्ये घालणे

कलशातील पाणी झाडांना घालू शकता आणि कलशावर ठेवलेला नारळ सुद्धा झाडांच्या मुळाशी ठेवणे शुभ मानले जाते.

तांदूळही विसर्जीत करा

पूजा झाल्यानंतर पूजा साहित्य पाण्यात विसर्जीत करणे उत्तम मानले जाते. कलशाखाली ठेवलेला नारळ असो वा तांदूळ. नवरात्रीनंतर सर्व काही पाण्यात विसर्जित केले पाहिजे. वास्तविक, असे केल्याने कोणताही दोष लागत नाही आणि पूजेचे पूर्ण फळ मिळते.

काय टाळावे

कलशातील नारळ विसर्जनाच्या वेळी नदीत किंवा अशुद्ध जागी टाकू नये, कारण ते अपमानकारक मानले जाते. नारळाचा चुकीच्या पद्धतीने वापर करणे टाळावे, जेणेकरून पूजेचे फळ मिळू शकेल.

(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking  केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking  कोणताही दावा करत नाही.)

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews