Kojagiri Purnima 2025 : कोजागिरी पौर्णिमेची व्रत कथा काय आहे? जाणून घ्या…

Published:
आज कोजागिरी पौर्णिमा आहे. चंद्राच्या प्रकाशात दूध आटवण्याला विशेष महत्त्व आहे. पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी देवी लक्ष्मीचा जन्म झाला होता, त्यामुळे ही तिथी धनप्राप्तीसाठी सर्वोत्तम मानली जाते. या दिवशी श्रीकृष्ण अवतार, धनाची देवी लक्ष्मी आणि सोळा कलेच्या चंद्राची पूजा केल्याने विविध वरदान प्राप्त होतात.
Kojagiri Purnima 2025 : कोजागिरी पौर्णिमेची व्रत कथा काय आहे? जाणून घ्या…

हिंदू धर्मात कोजागिरी पौर्णिमा हा सण महत्त्वाचा मानला जातो. हा सण दरवर्षी अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्दशीला कोजागिरी पौर्णिमा साजरी केली जाते. यंदा, कोजागिरी पौर्णिमा 6 ऑक्टोबर रोजी  म्हणजेच आज दुपारी 12:23 वाजता सुरू होईल आणि 7 ऑक्टोबर रोजी सकाळी 9:16 वाजल्याच्या सुमारास संपेल. चला तर मग, शरद पौर्णिमेची ही व्रत कथा सविस्तरपणे जाणून घेऊया…

कोजागिरी पौर्णिमेचे महत्त्व

पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी देवी लक्ष्मीचा जन्म झाला होता, त्यामुळे ही तिथी धनप्राप्तीसाठी सर्वोत्तम मानली जाते. या दिवशी श्रीकृष्ण अवतार, धनाची देवी लक्ष्मी आणि सोळा कलेच्या चंद्राची पूजा केल्याने विविध वरदान प्राप्त होतात.

कोजागिरी पौर्णिमा व्रत कथा

पौराणिक कथेनुसार, एक सावकार होता, त्याला दोन मुली होत्या. सावकाराच्या दोन्ही मुली मनापासून पौर्णिमेचे व्रत करत असत. पण मोठी मुलगी हे व्रत अत्यंत श्रद्धेने आणि सर्व नियम पाळून करत असे. मात्र, लहान मुलगी व्रत अर्धवट ठेवत असे. त्यामुळे, तिच्या घरात जन्मलेली मुले जिवंत राहत नव्हती. हे पाहून ती खूप दुःखी झाली. एके दिवशी तिने एका ब्राह्मणाला यामागील कारण विचारले. तेव्हा ब्राह्मण म्हणाला की, ‘तू पौर्णिमेचे व्रत नियमाने करत नाहीस, म्हणूनच मुझी मुलं लगेच मरण पावतात. मात्र, जर तू पौर्णिमेचे व्रत श्रद्धेने पूर्ण केलीस, तर तुला संततीसुख लाभेल’. ब्राह्मणाच्या सल्ल्यानुसार, सावकाराच्या लहान मुलीने कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी विधीपूर्वक उपवास केला. त्यानंतर, तिला एक लहान मुल झाला. मात्र, दुर्दैवाने त्या लहान बाळाचाही अल्पावधीतच मृत्यू झाला. या घटनेमुळे, ती निराश झाली. पण, बाळाला एका पाटावर ठेवून सावकाराच्या लहान मुलीने तिच्या मोठ्या बहिणीला घरी बोलावले. जेव्हा मोठी बहीण त्या पाटावर बसायला गेली, तेव्हा तिच्याजवळ असलेली हंडी सावकाराच्या लहान मुलीच्या मृत मुलाला लागला आणि अचानक रडू लागला. हे पाहून तिची मोठी बहीण आश्चर्यचकित झाली आणि आपल्या लहान बहिणीला म्हणाली की, ‘जर मी या पाटावर बसले असते, तर हा मुलगा मेला असता ना?’ तेव्हा सावकाराची लहान मुलगी म्हणाली, ‘हा मुलगा पूर्वीच मृत होता. मात्र, तुझ्या चांगल्या कर्मांमूळेच माझा मुलगा जिवंत झाला’. तेव्हापासून, अशी प्रथा सुरू झाली की, जो भाविक भक्तीभावाने कोजागिरी पौर्णिमाचे उपवास करेल, त्याला चांगले फळ मिळेल.

कोजागिरी पौर्णिमेला मसाला दूध का पितात?

कोजागिरी पौर्णिमेला मसाला दूध पितात. ही परंपरा अनेक वर्षांपासून प्रचलित आहे. पौराणिक मान्यतेनुसार, कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री चंद्राच्या किरणांमधून अमृताचा वर्षाव होतो. कोजागिरी पौर्णिमेला चंद्र हा पृथ्वीच्या जवळ असतो. चंद्राच्या प्रकाशात विशेष सकारात्मक उर्जा असते. या दिशी रात्री चंद्राच्या प्रकाशात दुध आटवल्याने त्याची किरणे दूधात पडतात. हिवाळ्याची सुरूवातीच्या काळात शरद पौर्णिमा येते. ऋतू बदल झाल्यानंतर अनेक संक्रमीत आजार बळावतात. तसेच आपल्या या काळात आपल्या शरिराला विशेष उर्जेची गरज असते. चंद्राच्या प्रकाशात आटवलेले दुध पिल्याने रोगप्रतीकारक शक्ती वाढते.

(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking  केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking  कोणताही दावा करत नाही.)

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews