Marathi News

कधी होईल कलियुगाचा अंत? विष्णू पुराणानुसार, कलियुगाची शेवट कसा असेल?

Published:
कलियुग कधी संपेल आणि तो कसा संपेल? हे असे प्रश्न आहेत जे प्रत्येकाच्या मनात आहेत कारण सध्या ज्या प्रकारच्या घटना घडत आहेत ते पाहता, कलियुगाचा शेवट किती भयानक असेल याची चिंता वाटणे स्वाभाविक आहे.
कधी होईल कलियुगाचा अंत? विष्णू पुराणानुसार, कलियुगाची शेवट कसा असेल?

लहानपणापासून आपण मोठ्यांकडून ऐकत आलो आहोत की पृथ्वीवरील पाप जसजसे वाढेल तसतसे जगाचा अंत होईल. सर्व पुराणांमध्ये असे नमूद केले आहे की कलियुगाची सुरुवात द्वापार युगानंतरच झाली आणि ते कधी संपेल याचे वर्णनही पुराणांमध्ये केले आहे. अशा परिस्थितीत मनात एकच विचार येतो, देव या युगातही अवतार घेईल का, असा चमत्कार घडेल का ज्यामुळे या युगाचा अंत होईल. या युगानंतर कोणता युग येईल? आज आम्ही तुम्हाला विष्णू पुराणात नमूद केलेल्या काही महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहोत जाणून घेऊया….

विष्णु पुराणात कलियुगाचा अंत कधी आहे?

विष्णु पुराणात कलियुग 4,32,000 वर्षांनी संपेल असं म्हटलं आहे. सध्या कलियुग सुरू होऊन 5126 वर्ष झाली आहेत, तर अजून 4,26,874 वर्ष बाकी आहेत. पुराणानुसार, कलियुगाची सुरुवात 3102 मध्ये झाली. इतर सर्व पुराणांमध्येही याचा उल्लेख आहे. याचा अर्थ कलियुग आता संपणार नाही. यासाठी अजूनही हजारो वर्षे शिल्लक आहेत, जेव्हा हे युग संपेल, तेव्हा पुन्हा एक नवीन युग सुरू होईल.

कलियुग म्हणजे काय?

कलियुग म्हणजे हिंदू धर्मानुसार, चार युगांपैकी (सतयुग, त्रेतायुग, द्वापरयुग, आणि कलियुग) शेवटचे युग. कलियुगाच्या आधी सत्ययुग, त्रेतायुग आणि द्वापरयुग होते. प्रत्येक युगामध्ये मानवी जीवनात काहीतरी बदल होत जातो, असे मानले जाते. “कलियुग” या नावाचा अर्थ “कलह आणि अंधकार” असा आहे. या युगात, मानवी जीवनात दु:ख, पाप आणि कलह जास्त असतात, असे मानले जाते. या युगात लोकांमध्ये वादविवाद, मत्सर आणि स्पर्धा जास्त असतात. लोक एकमेकांना फसवतात आणि त्यांच्या मनात द्वेषाची भावना असते. प्रत्येक गोष्टीबद्दल असंतोषाची भावना असते. त्यामुळे या युगाचे नाव कलियुग पडले. या युगात सत्य आणि धर्म कमी होतात, आणि दुर्गुण वाढतात. कलियुग म्हणजे “कलह-युग”, म्हणजे कलह आणि वाद असणारे युग. 

कलियुग संपल्यावर काय होईल?

विष्णु पुराणात असे वर्णन आहे की जेव्हा कलियुग संपेल तेव्हा वाईटाचा अंत होईल. सर्वत्र विनाशाची दृश्ये असतील. कलियुगाचा शेवट खूप भयानक असेल. विष्णु पुराणानुसार, कलियुगाच्या शेवटी, पाप आणि अधर्म आपल्या उच्चांकावर पोहोचतील, मानवांमध्ये प्रेम आणि सद्गुण कमी होतील, आणि फक्त पैसा आणि स्वार्थ महत्त्वाचे मानले जातील. माणसाचं आयुर्मान 20 वर्षांपर्यंत खाली येईल, नैसर्गिक आपत्ती वाढतील, आणि जगभरात दुष्काळ आणि रोगराई पसरतील. जेव्हा कलियुग आपल्या अंतिम टप्प्यावर असेल, तेव्हा भगवान कल्कि अवतार घेऊन पृथ्वीवर येतील आणि कलियुगाचा अंत करतील. विष्णू पुराणानुसार, कलियुगाच्या अंतामुळे पृथ्वीवर मोठे बदल होतील, ज्यात नैसर्गिक आपत्ती आणि विनाश यांचा समावेश असेल. घोर कलियुग सुरू होण्याआधी, धार्मिक स्थळे नष्ट होतील, आणि मानवांमध्ये अंधश्रद्धा आणि नकारात्मकता वाढेल. पुराणानुसार, सात वर्षांच्या मुली आई बनू लागतील, आणि कलियुगाच्या शेवटी, अनेक नैसर्गिक आपत्ती येतील. 

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews