Marathi News

तुम्हीही शिवलिंगावर अर्पण केलेला नैवेद्य खाता का? तर मग जाणून घ्या ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी

Published:
असे मानले जाते की, भक्तांनी शिवलिंगाला अर्पण केलेला प्रसाद खाऊ नये. यामागील नेमकं कारण काय आहे? शास्त्रात काय म्हटलंय? जाणून घेऊया
तुम्हीही शिवलिंगावर अर्पण केलेला नैवेद्य खाता का? तर मग जाणून घ्या ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी

श्रावण महिना 25 जुलैपासून सुरू होतोय. हा महिना भगवान महादेवांना समर्पित आहे. श्रावणाच्या पवित्र महिन्यात शिवलिंगावर अनेक प्रकारचे नैवेद्य अर्पण केले जातात. असे मानले जाते की भक्तांनी शिवलिंगाला अर्पण केलेला प्रसाद खाऊ नये. यामागील नेमकं कारण काय आहे? शास्त्रात काय म्हटलंय? जाणून घेऊया…

नैवेद्य शुद्ध आणि पवित्र असतो

शिवलिंग हे भगवान शंकराचे प्रतीक आहे आणि त्यावर अर्पण केलेला नैवेद्य थेट देवाला अर्पण केला जातो. नैवेद्य म्हणजे देवाला अर्पण केलेली वस्तू. ती देवाची झाली, त्यामुळे ती परत भक्ताने खाणे योग्य नाही. शिवलिंगावर नैवेद्य अर्पण केल्यावर तो शुद्ध आणि पवित्र होतो. तो प्रसाद म्हणून खाल्ल्यास त्याची पवित्रता कमी होते. 

मृत्यूनंतर मिळते भूत योनी

तुम्ही शिवलिंगावर अर्पण केलेला नैवेद्य खात असाल तर सावधान! कारण, शास्त्रांमध्ये शिवलिंगावर अर्पण केलेला नैवेद्य खाण्यास मनाई आहे. असे मानले जाते की शिवलिंगावर अर्पण केलेला नैवेद्य चंडेश्वरांना (भूतांचे प्रमुख) अर्पण केला जातो. त्यामुळे तो नैवेद्य खाणे योग्य नाही. आख्यायिकेनुसार, भगवान शिवाच्या मुखातून चंडेश्वर नावाचा गण प्रकट झाला, जो भूत आणि शिवगणांचा अधिपती आहे. त्यामुळे शिवलिंगाला अर्पण केलेला नैवेद्य चंडेश्वरला समर्पित असतो. शिवलिंगावर अर्पण केलेला नैवेद्य चंडेश्वरला समर्पित आहे आणि तो सेवन करणाऱ्या व्यक्तीला भूत योनी मिळते. धार्मिक श्रद्धेनुसार, असा प्रसाद खाल्ल्याने नकारात्मकता, मानसिक ताण किंवा इतर समस्या उद्भवू शकतात. शास्त्रानुसार, असा प्रसाद नदी किंवा जलाशयात वाहून टाकावा किंवा प्राण्यांना खायला द्यावा, कारण धार्मिक दृष्टिकोनातून तो पुण्यपूर्ण मानला जातो.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews