सप्टेंबर रोजी चंद्रग्रहण झाले. आता प्रतीक्षा आहे ती 21 सप्टेंबर रोजी होणाऱ्या सूर्यग्रहणाचीज्योतिषींच्या मते, 15 दिवसांत दोन ग्रहणे होत असल्याने काही राशींना मोठे नुकसान होणार आहे. शिवाय २१ सप्टेंबरचे सुर्यग्रहण हे या वर्षातील शेवटचे सुर्यग्रहण असणार आहे. २१ सप्टेंबर रोजी २०२५ या चालू वर्षातील शेवटचे सुर्यग्रहण होणार आहे. या ग्रहणाचा नेमक्या कोणत्या राशीवर कसा प्रभाव पडेल, तसेच ग्रहणाचे परिणाम आणि उपाय याबाबत सविस्तर जाणून घेऊ…

२१ सप्टेंबरच्या सुर्यग्रहणाबाबत…

सप्टेंबर महिना खूप खास मानला जात आहे. कारण एकीकडे हा महिना पितृपक्षापासून शारदीय नवरात्रीपर्यंत आहे, तर दुसरीकडे चंद्रग्रहणाव्यतिरिक्त या महिन्यात सूर्यग्रहणही होत आहे. अलिकडेच वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण झाले आहे. भारतात हे चंद्रग्रहण दिसले, ज्यामुळे पुढील 6 महिन्यांसाठी 12 राशींच्या जीवनात निश्चितच काही प्रकारचा परिणाम दिसून येऊ शकतो. त्याच वेळी, वर्षातील दुसरे आणि शेवटचे सूर्यग्रहण देखील या महिन्याच्या शेवटी होणार आहे.

21 सप्टेंबर रोजी होणारे सूर्यग्रहण रात्री 11 वाजता सुरू होईल आणि पहाटे 3 वाजून 23 मिनिटांपर्यंत चालेल. सप्टेंबर महिन्यातील दुसरे ग्रहण हे आंशिक सूर्यग्रहण आहे. तसेच, ते रात्रीच्या वेळी होत असल्याने, ते भारतात दिसणार नाही. जरी हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नसले तरी ते दक्षिण प्रशांत महासागर, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, हिंदी महासागर, अटलांटिक महासागर, दक्षिण महासागर, पॉलिनेशिया, मेलानेशिया, नॉरफोक बेट, आयलंड, क्राइस्टचर्च, वेलिंग्टन आणि न्यूझीलंड सारख्या देशांमध्ये दिसेल. सूर्यग्रहण होते तेव्हा सुतक काळ त्याच्या 12 तास आधी सुरू होतो, जो ग्रहणानंतर संपतो. या काळात कोणत्याही प्रकारचे शुभ कार्य करण्यास मनाई असते. तसेच मंदिरांचे दरवाजे देखील बंद ठेवण्यास सांगितले जातात. याशिवाय गर्भवती महिलांनी विशेष काळजी घेणे आवश्यक असते. पण हे आंशिक सूर्यग्रहण असल्याने ते भारतात दिसणार नाही. त्यामुळे सुतक काळ देखील भारतात वैध राहणार नाही.

कोणत्या राशीवर काय प्रभाव?

वृषभ

ज्योतिषशास्त्रानुसार, 15 दिवसांत दोन ग्रहणे शुभ मानली जात नाहीत. अशा परिस्थितीत वृषभ राशीच्या लोकांचा खर्च वाढेल. काळजी घ्याकरिअरमध्ये आव्हाने वाढतील. सध्या राहू तुमच्या चौथ्या घराकडे पाहत आहे. यामुळे तुम्ही दुःखी होऊ शकता. गुंतवणूक करणे टाळा.

सिंह

ज्योतिषशास्त्रानुसार, चंद्र आणि सूर्यग्रहणाच्या अशुभ परिणामांमुळे तुम्हाला पैशाच्या बाबतीत त्रास होऊ शकतो. मालमत्तेशी संबंधित नुकसान होईल. कुटुंबाशी तणाव निर्माण होईल. वडिलांसोबतच्या नात्यात दुरावा येऊ शकतो.

कर्क

ज्योतिषशास्त्रानुसार, सप्टेंबरपासून पुढील 90 दिवसांपर्यंत ऑनलाइन गुंतवणूक टाळा. पैशाचा गैरवापर तुम्हाला कर्जात बुडवू शकतो. विनाकारण कोणत्याही वादात पडू नका, तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा.

मिथुन

ज्योतिषशास्त्रानुसार, सप्टेंबरमध्ये चंद्र आणि सूर्यग्रहणामुळे मिथुन राशीच्या लोकांच्या समस्या वाढू शकतात. आईशी वाद होऊ शकतो, जिभेवर नियंत्रण ठेवा, कामाचा दबाव वाढेल. बाजारात पैसे अडकू शकतात. काळजीपूर्वक विचार केल्यानंतर विश्वास ठेवा.

उर्वरीत आठ राशींसाठी हे सुर्यग्रहण तितकेसे हानिकारक राहणार नाही. तसेच या काळात वरील चार राशींना विशेष काळजी घ्यावी लागेल, त्यानुरूप आचरण करावे लागेल.

टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.