इंदूरमधील होळकर स्टेडियमवर झालेल्या आयसीसी महिला विश्वचषक २०२५ च्या २० व्या सामन्यात भारताची अष्टपैलू खेळाडू दीप्ती शर्माने एक मोठा टप्पा गाठला. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात दीप्तीने भारताला गोलंदाजीत पहिले यश मिळवून दिले आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये १५० बळींचा टप्पा गाठून इतिहासही रचला.
दीप्ती शर्माने कमाल केली
हे ही वाचा
टॉस जिंकून पहिले बॅटिंगसाठी उतरलेली इंग्लंडची टीम नेहमीच चांगली सुरुवात करत होती. टॅमी ब्यूमोंट आणि एमी जोन्स या सलामी जोडीने पहिल्या विकेटसाठी ७३ धावांची भागीदारी केली. भारतीय स्पिनर दीप्ती शर्माने ही भागीदारी तोडली.
दीप्ती शर्माने आपल्या पहिल्या ओव्हरमध्ये भारताला विकेट दिला. १६व्या ओव्हरमध्ये तिने ब्यूमोंटला बोल्ड करून पॅव्हेलियनवर पाठवले. यामुळे दीप्ती शर्माचं नाव इतिहासात नोंदवले गेले. टॅमी ब्यूमोंटला आऊट करताच दीप्तीने ODI क्रिकेटमध्ये आपले १५० विकेट पूर्ण केले.
भारतीय स्टार स्पिनर दीप्ती शर्मा हे ODI क्रिकेटच्या इतिहासातील १५० विकेट काढणाऱ्या जगातील दहाव्या महिला गोलंदाज आहेत.
जगातील चौथी खेळाडू
दीप्ती शर्मा आता जगातील फक्त चौथ्या महिला खेळाडू झाली आहे जिने ODI मध्ये २००० हून अधिक धावा आणि १५० विकेट्स मिळवले आहेत. यापूर्वी ही कामगिरी एलिस पेरी (ऑस्ट्रेलिया), स्टेफनी टेलर (वेस्ट इंडीज) आणि मरिजाने कॅप (दक्षिण आफ्रिका) यांनी केली आहे.
२००० धावा आणि १५० विकेट्स पूर्ण करणाऱ्या खेळाडू
-
एलिस पेरी (ऑस्ट्रेलिया): ४४१४ धावा, १६६ विकेट्स
-
स्टेफनी टेलर (वेस्ट इंडीज): ५८७३ धावा, १५५ विकेट्स
-
मरिजाने कॅप (दक्षिण आफ्रिका): ३३९७ धावा, १७२ विकेट्स
-
दीप्ती शर्मा (भारत): २६०७ धावा, १५० विकेट्स
अशी कामगिरी करणारी दुसरी भारतीय
इतकेच नाही, दीप्ती शर्माने आणखी एक मोठा विक्रम केला आहे. ती ODI मध्ये १५० किंवा त्याहून अधिक विकेट्स घेणारी दुसरी भारतीय गोलंदाज झाली आहे. याआधी हे कारनामा महान गोलंदाज झूलन गोस्वामी यांनी केला होता, ज्यांनी २०४ सामने खेळून २५५ विकेट्स मिळवल्या आहेत.
एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणाऱ्या भारतीय महिला गोलंदाज
झुलन गोस्वामी – २०४ सामन्यांमध्ये २५५ बळी
दीप्ती शर्मा – ११७ सामन्यांमध्ये १५१ बळीनीतू डेव्हिड – ९७ सामन्यांमध्ये १४१ बळी
नुशीन अल खादीर – ७८ सामन्यांमध्ये १०० बळी
राजेश्वरी गायकवाड – ६४ सामन्यांमध्ये ९९ बळी
दीप्ती शर्माची कामगिरी केवळ भारतासाठी अभिमानाची गोष्ट नाही तर महिला क्रिकेटच्या इतिहासात तिचे नाव सुवर्णाक्षरांनी कोरले आहे. आता दीप्ती २०० बळींचा टप्पा गाठण्यात यशस्वी होते का हे पाहणे मनोरंजक ठरेल.