टी-२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत कोणते दोन संघ खेळतील? मायकल क्लार्कची भविष्यवाणी

Published:
ग्रुप स्टेजमध्ये, टीम इंडिया पाकिस्तान, अमेरिका, नेदरलँड्स आणि नामिबियासह ग्रुप ए मध्ये आहे, तर ऑस्ट्रेलिया श्रीलंका, झिम्बाब्वे, आयर्लंड आणि ओमानसह ग्रुप बी मध्ये आहे.
टी-२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत कोणते दोन संघ खेळतील? मायकल क्लार्कची भविष्यवाणी

आयसीसी मेंस टी20 वर्ल्ड कप 2026 ची सुरुवात 7 फेब्रुवारीपासून होणार आहे. भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त यजमानपदाखाली ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच सर्व क्रिकेट तज्ज्ञ आपापल्या भाकितांसह पुढे येत आहेत. अशातच ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकेल क्लार्क यांनी टी20 वर्ल्ड कप 2026 मधील अंतिम सामना कोण खेळेल तसेच भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याबाबत मोठे विधान केले आहे. उल्लेखनीय म्हणजे, टीम इंडियाची टी20 वर्ल्ड कपमधील मोहीम 7 फेब्रुवारीपासून सुरू होणार असून पाकिस्तानविरुद्धचा महामुकाबला 15 फेब्रुवारी रोजी खेळवला जाणार आहे.

क्लार्कची भविष्यवाणी

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकेल क्लार्कने सांगितले की, २०२६ च्या टी-२० विश्वचषक अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाचा सामना भारताशी होईल. भारत आणि ऑस्ट्रेलिया शेवटचा आयसीसी स्पर्धेच्या अंतिम फेरीत २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम फेरीत आमनेसामने आले होते, जिथे ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला होता.

ग्रुप स्टेजमध्ये, टीम इंडिया पाकिस्तान, अमेरिका, नेदरलँड्स आणि नामिबियासह ग्रुप ए मध्ये आहे, तर ऑस्ट्रेलिया श्रीलंका, झिम्बाब्वे, आयर्लंड आणि ओमानसह ग्रुप बी मध्ये आहे.

भारत–पाकिस्तान सामन्याबाबत मायकेल क्लार्क काय म्हणाला?

भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणाऱ्या महामुकाबल्याबाबत मायकेल क्लार्क यांनी बियॉन्ड23 क्रिकेट पॉडकास्टवर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “हा थरारक सामना पाहण्यासाठी सगळेच उत्सुक असतात. मात्र, भारताने दीर्घकाळ पाकिस्तानवर वर्चस्व राखले आहे. पाकिस्तान कधीही खऱ्या अर्थाने भारताच्या जवळ पोहोचू शकलेला नाही. भारतासोबत खेळताना आणि या प्रतिस्पर्धी लढतीच्या दडपणाचा सामना कसा करायचा, हे पाकिस्तानला शिकावे लागेल.”

Follow Us :GoogleNews