वास्तुशास्त्र हे एक असं शास्त्र आहे, ज्यामुळे घरात निर्माण होणार्या वास्तुदोषापासून मुक्ती मिळू शकते, वास्तुशास्त्रात अनेक सोपे उपाय सांगण्यात आले आहेत, वास्तुशास्त्रानुसार घरात कधीच चपला बूट घालून जाऊ नये. पण का? चला तर मग याबद्दल जाणून घेऊयात…
नकारात्मक ऊर्जा
चप्पल-बूट बाहेरच्या जगातील नकारात्मक ऊर्जा घरात आणतात, ज्यामुळे घरात अशांतता पसरू शकते, असे वास्तुशास्त्र मानते. ज्यामुळे घरातील सकारात्मकता कमी होते. मुख्य दरवाजातून सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते. घराचे पावित्र्य राखण्यासाठी आणि सकारात्मक ऊर्जा टिकवण्यासाठी चपला बाहेर काढणे आवश्यक आहे.
अस्वच्छता
बाहेरून येणारी धूळ, माती आणि जंतू चपलांमधून घरात पसरतात, जे आरोग्यासाठी चांगले नाही.
वास्तुदोष
घरात चपला-बूट घालणे किंवा चुकीच्या ठिकाणी ठेवणे (विशेषतः उलट्या ठेवणे) यामुळे वास्तुदोष निर्माण होतात, ज्यामुळे कुटुंबात कलह, तणाव आणि आर्थिक समस्या वाढतात. बूट-चप्पल घालून आल्याने हे पावित्र्य भंग पावते. यामुळे वास्तुदोष निर्माण होतो आणि घरात कलह, तणाव व आर्थिक समस्या वाढू शकतात.
लक्ष्मी नाराज होते
उत्तर आणि पूर्व दिशा लक्ष्मीची मानली जाते. या दिशांना चपला ठेवल्याने किंवा घालून प्रवेश केल्याने संपत्तीचे नुकसान होते आणि लक्ष्मी नाराज होते.
योग्य जागा
चपला-बूट घराच्या पश्चिम, वायव्य किंवा नैऋत्य दिशेला ठेवाव्यात, पण बेडरूममध्ये किंवा मुख्य दरवाजाजवळ ठेवू नयेत. घरात बूट-चप्पल घालून फिरणे हे वास्तुशास्त्र आणि आरोग्याच्या दृष्टीने चुकीचे आहे; त्यामुळे घरात प्रवेश करण्यापूर्वी त्यांना योग्य जागी ठेवणे आवश्यक आहे.
ईशान्य दिशेचे महत्त्व
ईशान्य दिशा ही घरातील सर्वात पवित्र जागा मानली जाते, जिथे देव वास करतात. या दिशेला चपला-बूट ठेवणे अत्यंत अशुभ मानले जाते. या दिशा देवांची आणि लक्ष्मीची मानली जाते, त्यामुळे या दिशेला चप्पल-बूट ठेवू नयेत.
यासाठी काय करावे?
- घरात प्रवेश करण्यापूर्वीच चप्पल-बूट काढून ठेवा.
- त्यांना ठरलेल्या शू-रॅकमध्ये किंवा योग्य कोपऱ्यात ठेवा.
- चपला आणि बूट नेहमी स्वच्छ ठेवा आणि तुटलेल्या किंवा जुन्या चपला घरात ठेवू नका.
- स्वयंपाकघर आणि पूजाघर या पवित्र जागांमध्ये चप्पल-बूट ठेवणे अशुभ मानले जाते.
- उघड्यावर आणि विखुरलेले चप्पल-बूट विखुरलेले ठेवू नयेत, यामुळे नकारात्मक ऊर्जा वाढते.
- चप्पल उलट्या ठेवल्याने घरात तणाव आणि वाद वाढू शकतात.
- जुने आणि तुटलेले बूट-चप्पल घरात ठेवू नयेत.
- घरातील स्वच्छता राखणे आणि सकारात्मक विचार करणे महत्त्वाचे आहे, असेही वास्तुशास्त्र सांगते.
- रात्री झोपण्यापूर्वी सर्व चपला व्यवस्थित एका जागी ठेवा, विखुरलेल्या नसाव्यात, यामुळे मानसिक शांतता राहते.
(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)





