श्रावण महिना 25 जुलैपासून सुरू होतोय. हा महिना भगवान महादेवांना समर्पित आहे. श्रावणाच्या पवित्र महिन्यात शिवलिंगावर अनेक प्रकारचे नैवेद्य अर्पण केले जातात. असे मानले जाते की भक्तांनी शिवलिंगाला अर्पण केलेला प्रसाद खाऊ नये. यामागील नेमकं कारण काय आहे? शास्त्रात काय म्हटलंय? जाणून घेऊया…
नैवेद्य शुद्ध आणि पवित्र असतो
शिवलिंग हे भगवान शंकराचे प्रतीक आहे आणि त्यावर अर्पण केलेला नैवेद्य थेट देवाला अर्पण केला जातो. नैवेद्य म्हणजे देवाला अर्पण केलेली वस्तू. ती देवाची झाली, त्यामुळे ती परत भक्ताने खाणे योग्य नाही. शिवलिंगावर नैवेद्य अर्पण केल्यावर तो शुद्ध आणि पवित्र होतो. तो प्रसाद म्हणून खाल्ल्यास त्याची पवित्रता कमी होते.
हे ही वाचा
मृत्यूनंतर मिळते भूत योनी
तुम्ही शिवलिंगावर अर्पण केलेला नैवेद्य खात असाल तर सावधान! कारण, शास्त्रांमध्ये शिवलिंगावर अर्पण केलेला नैवेद्य खाण्यास मनाई आहे. असे मानले जाते की शिवलिंगावर अर्पण केलेला नैवेद्य चंडेश्वरांना (भूतांचे प्रमुख) अर्पण केला जातो. त्यामुळे तो नैवेद्य खाणे योग्य नाही. आख्यायिकेनुसार, भगवान शिवाच्या मुखातून चंडेश्वर नावाचा गण प्रकट झाला, जो भूत आणि शिवगणांचा अधिपती आहे. त्यामुळे शिवलिंगाला अर्पण केलेला नैवेद्य चंडेश्वरला समर्पित असतो. शिवलिंगावर अर्पण केलेला नैवेद्य चंडेश्वरला समर्पित आहे आणि तो सेवन करणाऱ्या व्यक्तीला भूत योनी मिळते. धार्मिक श्रद्धेनुसार, असा प्रसाद खाल्ल्याने नकारात्मकता, मानसिक ताण किंवा इतर समस्या उद्भवू शकतात. शास्त्रानुसार, असा प्रसाद नदी किंवा जलाशयात वाहून टाकावा किंवा प्राण्यांना खायला द्यावा, कारण धार्मिक दृष्टिकोनातून तो पुण्यपूर्ण मानला जातो.