Marathi News

Narali Purnima 2025 : नारळी पौर्णिमेचा सण कसा साजरा केला जातो आणि त्याचे महत्त्व काय जाणून घ्या…

Published:
श्रावण महिन्याला धार्मिक सण, उत्सव आणि व्रत यांचा महिना म्हणतात. या महिन्यापासून अनेक सणांना सुरुवात होते. यातील नारळी पौर्णिमा हा सण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
Narali Purnima 2025 : नारळी पौर्णिमेचा सण कसा साजरा केला जातो आणि त्याचे महत्त्व काय जाणून घ्या…

श्रावण महिना हा सणांचा महिना म्हणून ओळखला जातो. यामध्ये अनेक महत्त्वाचे सण साजरे केले जातात. नागपंचमीनंतर येणारा महत्त्वाचा सण नारळी पौर्णिमा. श्रावण महिन्यातील शुक्ल पौर्णिमेला नारळी पौर्णिमा साजरी केली जाते. या दिवशी रक्षाबंधन हा सण देखील साजरा केला जातो. या दिवशी कोळी बांधव समुद्राची विधीवत पूजा करतात. तसेच समुद्राला नारळ अर्पण करुन प्रार्थना देखील करतात. जाणून घेऊया पौर्णिमा तिथी कशी साजरी करायची आणि त्याचे महत्त्व…

कधी आहे नारळी पौर्णिमा? 

हिंदू पंचांगानुसार, यावर्षी श्रावणी पौर्णिमेची तिथी शुक्रवार, 8 ऑगस्ट 2025 रोजी 02 वाजून 12 मिनिटांनी सुरू होईल. दुसऱ्या दिवशी 9 ऑगस्ट 2025, रोजी शनिवारी दुपारी 01 वाजून 24 मिनिटांनी संपेल. उदयतिथीनुसार 9 ऑगस्ट 2025, रोजी नारळी पौर्णिमा साजरी केली जाईल.

नारळी पौर्णिमेचे महत्व

नारळी पौर्णिमा, जी श्रावण महिन्यातील पौर्णिमेला येते, महाराष्ट्रात आणि विशेषतः कोळी समाजात खूप महत्त्वाची आहे. या दिवशी, समुद्राची पूजा करून समुद्राला नारळ अर्पण केला जातो. या पूजेचा मुख्य उद्देश म्हणजे समुद्रातील देवता वरुण देवाला प्रसन्न करणे आणि मच्छिमारांच्या सुरक्षित प्रवासासाठी प्रार्थना करणे. नारळी पौर्णिमेच्या दिवशी, कोळी बांधव समुद्राची पूजा करतात आणि समुद्राला नारळ अर्पण करतात. वरुण देव हा जल आणि समुद्राचा देव मानला जातो, त्याची आराधना करणे आणि त्याला प्रसन्न करणे, हे या दिवसाचे मुख्य उद्दिष्ट आहे. नारळी पौर्णिमा मच्छिमारांसाठी खूप महत्त्वाची आहे, कारण या दिवशी ते समुद्रात सुरक्षिततेसाठी आणि चांगल्या प्रवासासाठी प्रार्थना करतात. पावसाळ्याच्या दिवसांनंतर, समुद्रातील खवळलेला अंदाज कमी झाल्यावर, कोळी बांधव मासेमारीला सुरुवात करतात, त्यामुळेही या दिवसाला महत्व आहे. 

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews