श्रावण महिना हा भगवान भोलेनाथाला समर्पित आहे. असं म्हणतात श्रावणातील सोमवारी उपवास केल्याने मनोकामना पूर्ण होतात. आणि उपवास म्हटला की घराघरात उपवासांच्या पदार्थांची रेलचेल सुरू असते. श्रावणातल्या उपवासात विविध पदार्थ खाल्ले जाऊ शकतात, उपवासाच्या दिवसांत गोड खाण्याची इच्छा सर्वांनाच होते, पण तीच ती साबुदाण्याची खीर किंवा फलाहारी हलवा खाऊन कंटाळा येतो. अशा वेळी काहीतरी वेगळं आणि चविष्ट खायचं असेल, तर बटाट्याची जिलेबी एक उत्तम पर्याय आहे. उपवासात बनणारी ही जिलेबी सोपी आणि स्वादिष्ट आहे. त्याची चव केवळ अप्रतिमच नाही तर बनवायलाही खूप सोपी आहे. जाणून घेऊया….

साहित्य

  • उकडलेले बटाटे: ४-५ मध्यम आकाराचे
  • शेंगदाणा कूट: १/४ कप
  • साबुदाणा पीठ: १/४ कप
  • जिरेपूड: १/२ चमचा
  • मिरची पूड: १/२ चमचा (आवडीनुसार)
  • सैंधव मीठ: चवीनुसार
  • साखर: १/२ कप
  • पाणी: १/२ कप
  • तूप किंवा तेल: तळण्यासाठी

कृती

  • उकडलेले बटाटे चांगले कुस्करून घ्या.
  • त्यात शेंगदाणा कूट, साबुदाणा पीठ, जिरेपूड, मिरची पूड आणि सैंधव मीठ घालून चांगले मिक्स करा.
  • पिठाचा गोळा मळून घ्या.
  • जिलेबीच्या साच्यात किंवा प्लास्टिकच्या पिशवीत पीठ भरून गरम तेलात जिलेबी तळून घ्या.
  • दुसरीकडे, साखर आणि पाणी गरम करून एक तारी पाक तयार करा.
  • तळलेल्या जिलेब्या गरम पाकात बुडवून घ्या.
  • गरमागरम जिलेबी उपवासासाठी तयार आहे!