जेवल्यानंतर नियमित करा ‘हे’ ४ काम, पचनक्रिया सुधारण्यासोबत मिळतील विविध फायदे

Published:
खालेल्या अन्नाचे पचन तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे. जर तुमचे अन्न योग्यरित्या पचले नाही तर ते तुमची पचनसंस्था कमकुवत करू शकते.
जेवल्यानंतर नियमित करा ‘हे’ ४ काम, पचनक्रिया सुधारण्यासोबत मिळतील विविध फायदे

What to do to improve digestion:   आजकाल लोक ऑफिस आणि घरातील कामांमध्ये इतके गुंतलेले आहेत की त्यांच्याकडे स्वतःची काळजी घेण्यासाठीही वेळ नाही. याचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहणे हे कोणत्याही व्यक्तीच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे.

म्हणूनच, तज्ज्ञ जेवणानंतर फिरायला जाण्याचा किंवा इतर कामे करण्याचा सल्ला देतात. खालेल्या अन्नाचे पचन तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे. जर तुमचे अन्न योग्यरित्या पचले नाही तर ते तुमची पचनसंस्था कमकुवत करू शकते आणि इतर आरोग्य समस्या निर्माण करू शकते. त्यामुळेच आज आपण जेवल्यानंतर पचनक्रिया सुधारण्यासाठी काय करावे याबाबत जाणून घेऊया….

१०० पावले चालणे-
तज्ज्ञांच्या मते जेवणानंतर किमान १०० पावले चालण्याचा प्रयत्न करा. १०० पावले चालणे, ज्याला शतपावली असेही म्हणतात, तुमच्या पचनसंस्थेला सुरळीत करते आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करते. १०० पावले चालणे तुमच्या शरीरात ग्लुकोज वेगाने घेण्याऐवजी हळूहळू शोषण्यास मदत करते.

बसून टाच उंचावणे-
जर तुम्ही शतपावली करू शकत नसाल, तर खुर्चीवर बसून तुमच्या टाचा वर करण्याचा प्रयत्नदेखील करू शकता. जरी ही क्रिया तुमच्या संपूर्ण शरीराची हालचाल करत नसली तरी, ती तुमच्या स्नायूंना सक्रिय करते, जे इन्सुलिन संवेदनशीलता वाढवण्यासाठी पुरेसे आहे. ही क्रिया रक्ताभिसरण वाढविण्यास मदत करते, ज्यामुळे पोषक तत्वे चांगल्या प्रकारे शोषण्यास मदत होते. ज्यांना सांधेदुखी आहे किंवा दीर्घकाळ उभे राहण्याची समस्या आहे त्यांच्यासाठी ही क्रिया एक चांगला पर्याय आहे.

वज्रासन-
जेवणानंतर लगेच वज्रासन केल्याने पोट आणि आतड्यांमध्ये रक्तप्रवाह सुधारून पचनक्रिया सुधारते. ऍसिडिटी आणि पोटफुगी रोखण्यासोबतच, हे आसन पॅरासिम्पेथेटिक मज्जासंस्था देखील सक्रिय करू शकते. ज्यामुळे शरीराची ऊर्जा आणि पचनक्रिया सुधारण्यास मदत होते.

उभे राहून टाच उंच करणे-
जेवणानंतर तुम्ही उभे राहून टाचा उंच करू शकता. यामुळे तुमच्या स्नायूंना आकुंचन देईल आणि स्नायूंच्या सक्रिय करण्यासाठी रक्तप्रवाहातून ग्लुकोज काढण्यास मदत करेल. याव्यतिरिक्त, ते स्नायूंमध्ये थेट ग्लुकोज वापरण्याची शरीराची क्षमता सुधारून इन्सुलिनची पातळी राखण्यास मदत करते. तसेच आतड्यांची हालचाल सुधारून पचनक्रिया सुरळीत करते.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)

Aiman Jahangir Desai
लेखकाबद्दल
ऐमन जहागीर देसाई गेली 7 वर्षे पत्रकारितेत आहे. अडीच वर्षे न्यूज 18 लोकमत त्यानंतर दीड वर्षे हिंदुस्थान टाइम्स डिजिटलमध्ये काम केलं आहे. तिला मनोरंजन, लाइफस्टाइल, अध्यात्म या विषयांमध्ये रुची आहे. या विषयांच्या बातम्या करण्यात ती अधिक रमते. View all posts by Aiman Jahangir Desai
Follow Us :GoogleNews