Marathi News

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! किसान सन्मान निधीच्या 20 व्या हप्त्याची तारीख ठरली, कोणत्या दिवशी खात्यात येणार 2 हजार?

Written by:Rohit Shinde
Published:
ल्या अनेक दिवसांपासून पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 20 व्या हप्त्याची रक्कम कधी मिळणार याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना होती. अखेर पीएम किसानच्या 20 व्या हप्त्याच्या वितरणाची तारीख समोर आली आहे.
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! किसान सन्मान निधीच्या 20 व्या हप्त्याची तारीख ठरली, कोणत्या दिवशी खात्यात येणार 2 हजार?

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 20 व्या हप्त्याची रक्कम कधी मिळणार याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना होती. अखेर पीएम किसानच्या 20 व्या हप्त्याच्या वितरणाची तारीख समोर आली आहे. याबाबत आलेल्या अपडेटनुसार आठवडाभरात शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार असल्याची माहिती समोर येत आहे.

2 ऑगस्टला खात्यामध्ये जमा होणार पैसे !

2000 रुपये 2 ऑगस्टला शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केले जाणार आहेत. पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत एक्स खात्यावरुन याबाबत घोषणा करण्यात आली आहे. पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्स वरुन 20 व्या हप्त्याबाब घोषणा करण्यात आली आहे. आता अधिक वेळ वाट पाहावी लागणार नाही.

पीएम किसानच्या 20 व्या हप्त्याची रक्कम ऑगस्ट 2025 ला वाराणसी,उत्तर प्रदेश येथील कार्यक्रमातून शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवली जाईल.

20 व्या हप्त्याची प्रतीक्षा संपली! 

पीएम किसान सन्मान निधी योजना कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय यांच्याकडून चालवली जाते. या योजनेची सुरुवात फेब्रुवारी 2019 ला करण्यात आली होती. तेव्हापासून पात्र शेतकऱ्यांना 19 हप्त्यांची रक्कम देण्यात आली आहे. 19 व्या हप्त्याची रक्कम बिहारमध्ये कार्यक्रम आयोजित करुन जारी करण्यात आली होती. केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारनं नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरु केली होती. त्या योजनेतून देखील शेतकऱ्यांना वार्षिक 6000 रुपये दिले जातात. या योजनेचा पुढचा हप्ता कधी मिळणार याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना आहे.

पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या अपडेटसाठी योजनेची वेबसाईट आणि  एक्स वरील योजनेचं अधिकृत खातं याशिवाय सोशल मीडियातून पसरवल्या जाणाऱ्या माहितीवर विश्वास ठेवू नका, असं आवाहन करण्यात आलं आहे. शेतकऱ्यांनी सावधानता बाळगावी असे आवाहन करण्यात आले आहे.

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews