राज्यातील मान्सून काहीसा संथ पडल्याच चित्र आहे. मान्सून रखडल्याने पुढील वाटटाल लांबणीवर पडली आहे. तर दुसरीकडे विदर्भ आणि कोकणात मात्र पावसाची स्थिती कायम राहणार असल्याचा अंदाज आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि कल्याण-डोंबिवली परिसरात हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे. विदर्भात वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाचा नेमका अंदाज काय आहे? ते सविस्तर जाणून घेऊ…

10 जूनपर्यंत मान्सून लांबणार?

पाऊस ओसरल्यानंतर दमट आणि ढगाळ हवामानामुळे उष्णतेची झळ जाणवू लागली आहे, त्यामुळे उकाडा पुन्हा वाढला आहे. दुसरीकडे, मान्सूनचा प्रवासही लांबणीवर पडलेला आहे. 6 जूनपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता नाही. काही जिल्ह्यांमध्ये एक दिवस पाऊस तर दुसऱ्या दिवशी विश्रांती असा लपंडाव सुरू आहे. मान्सून महाराष्ट्रात प्रवेश करून 12 दिवस झाले असले तरी तो अद्याप मराठवाड्याच्या सीमेवरच अडकलेला आहे. 10 जूनपर्यंत मान्सूनचा प्रवास विलंबाने होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. उर्वरित महाराष्ट्रात आज हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

कोकण आणि विदर्भात पाऊस बरसणार

धो-धो कोसळल्यानंतर आता पावसाने थोडी विश्रांती घेतली आहे. हवामान विभागाने विकेंडसाठी पावसाच्या हलक्या सरींचा अंदाज व्यक्त केला आहे. मुंबई, ठाणे, उपनगर, नवी मुंबई आणि कल्याण-डोंबिवली या भागांमध्ये हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे. तसेच, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये आज हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाच्या (IMD) नवीन अंदाजानुसार, मागील 24 तासांमध्ये हवामानात लक्षणीय बदल झाले आहेत. विदर्भातील काही भागांमध्ये शुक्रवारी मुसळधार पाऊस झाला.

3 जूनपासून विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये सोसाट्याच्या वादळी वाऱ्यांसह पुन्हा पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. मान्सून महाराष्ट्रात प्रवेश करून 12 दिवस झाले असले तरी तो अद्याप मराठवाड्याच्या सीमेवरच अडकलेला आहे. 10 जूनपर्यंत मान्सूनचा प्रवास विलंबाने होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. उर्वरित महाराष्ट्रात आज हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

देशभरात सध्या काय स्थिती?

उत्तर-पश्चिम उत्तर प्रदेश, मध्य उत्तर प्रदेश, दक्षिण पंजाब, पश्चिम राजस्थान तसेच पाकिस्तानच्या मध्य भागात सायक्लोनिक सर्क्युलेशन निर्माण झाले आहे. पश्चिम बंगालच्या उपसागरामधील कमी दाबाचा पट्टा आता कमकुवत होत चालला आहे आणि तो हळूहळू उत्तर-पूर्व दिशेकडे सरकत आहे. पुढील 12 तासांत या प्रणालीमध्ये काय बदल होतात, याकडे हवामान विभागाचे लक्ष राहणार आहे. पुढील 24 तास ते 2 दिवसांत तापमानात 2 ते 4 अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र, किमान तापमानात फारसा बदल होणार नाही.
पुढील 5 दिवसांसाठी उत्तर बंगालची खाडी, मध्य आणि दक्षिण बंगालच्या खाडीत मच्छिमारांनी समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच, कर्नाटकचा किनारी भाग, केरळ आणि दक्षिण-पूर्व अरबी समुद्राच्या परिसरात 40 ते 55 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्याने, या भागांमध्येही मच्छिमारांना समुद्रात न जाण्याची सूचना देण्यात आली आहे.