Fri, Dec 26, 2025

Onion Price: महाराष्ट्रातील बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या दरात मोठी उलथापालथ; आज काय भाव ?

Written by:Rohit Shinde
Published:
आज राज्यभरातील बहुतांश बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या दरात मोठी उलथापालथ झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. बाजारातील आजचे कांद्याचे दर जाणून घेऊ...
Onion Price: महाराष्ट्रातील बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या दरात मोठी उलथापालथ; आज काय भाव ?

महाराष्ट्रातील बहुतांश बाजार समित्यांमध्ये सध्या कांद्याची आवक चांगलीच वाढताना दिसत आहे. परिणामी दरामध्ये सातत्याने घसरण सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. शेतकऱ्यांमध्ये यामुळे चिंतेचे वातावरण सध्या पाहायला मिळत आहे. दरामध्ये सुधारणा होण्याची कोणतीही चिन्हे सध्या दिसत नसल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे. एकुणच बाजारात कांद्याच्या दरामध्ये मोठी उलथापालथ झाली आहे. आज बुधवारी, 24 डिसेंबरला कांदा  दरात घसरण नोंदविण्यात आली आहे. आज कांद्याच्या दरात लक्षणीय घट दिसून आली, राज्यभरातील दराचे अपडेट्स जाणून घेऊ…

राज्यात कांद्याच्या दरात लक्षणीय घट

राज्याच्या मार्केटमध्ये 1 लाख, 58 हजार 815 क्विंटल कांद्याची एकूण आवक झाली. यापैकी 53 हजार 775 क्विंटल सर्वाधिक आवक सोलापूर बाजारात झाली. त्यास प्रतीनुसार 100 ते 2700 रुपयांपर्यंत बाजार भाव मिळाला. तसेच अमरावती मार्केटमध्ये आवक झालेल्या 339 क्विंटल कांद्यास 1300 ते 2800 रुपये दरम्यान सर्वाधिक बाजारभाव मिळाला. मंगळवारच्या तुलनेत कांद्याच्या दरात आज घसरण झालेली दिसून येत आहे.

देशभरात कांद्याच्या दरामध्ये घसरण

देशभरात कांद्याच्या दरात घसरण ही सध्याची समस्या आहे. यामागचे मुख्य कारण म्हणजे बाजारात कांद्याची मोठ्या प्रमाणावर उपलब्धता. आवक वाढल्यामुळे भाव घसरले आहेत, ज्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. कांद्याच्या या घसरणीमुळे किरकोळ विक्रेते आणि ग्राहकांनाही फायदा होतो, कारण कमी किमतीत कांदा मिळतो. मात्र शेतकऱ्यांसाठी ही चिंता वाढवणारी बाब आहे. शेतकऱ्यांनी या परिस्थितीत साठा व्यवस्थापन आणि उत्पादनाचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे, तसेच बाजारपेठेतील मागणी-पुरवठ्याचा अभ्यास करून भाव स्थिर ठेवण्याचे उपाय करणे गरजेचे आहे.

शेतकऱ्यांनी बाजाराचा नियमित अभ्यास करणे अत्यंत गरजेचे आहे. यामुळे त्यांना उत्पादनाची योग्य प्रमाणात वाढ किंवा कपात करण्यास मदत होते, तसेच कोणत्या काळात उत्पादन विकणे फायदेशीर ठरेल हे ठरवता येते. बाजारातील भाव, मागणी-पुरवठा, हंगामानुसार बदल, विविध बाजारपेठांतील दर यांचा अभ्यास केल्यास शेतकऱ्यांना आर्थिक तोटा टाळता येतो.