राज्यातील काही भागांत पावसाने जोर पकडला असून, श्रावणातील सरी बरसताना दिसत आहेत. आज मुंबई, कोकण, घाटमाथा तसेच अन्य भागांत जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे काही जिल्ह्यांना ऑरेंज तर काहींना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील 24 तासांसाठीचा हवामान विभागाने दिलेला अंदाज समजून घेऊया…
मुंबई, कोकणपट्ट्यात मुसळधार पावसाचा अंदाज
घाटमाथा, मध्य महाराष्ट्रात पाऊस बरसणार
खरंतर या काळात कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांसाठी आज हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. काही भागांत जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विशेषतः घाटमाथ्यावरील आणि नद्यांच्या काठावर असलेल्या परिसरात पाण्याची पातळी वाढू शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. नागरिकांनी या काळात विशेष काळजी घ्यावी असे आवाहन हवामान विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून करण्यात आले आहे.
मध्य महाराष्ट्रातील धाराशिव, लातूर आणि आजुबाजूच्या भागांत पावसाचा जोर राहिल. विदर्भातील पूर्वेकडील जिल्हे भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि नागपूर या जिल्ह्यांत काही दिवस पावसाचा जोर वाढत जाणार आहे. शेतकऱ्यांसाठी ही खऱ्या अर्थाने आनंदाची बातमी मानली जात आहे.
⛈️⚠️भारतीय हवामान विभागाने मुंबई महानगरात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) दिला आहे.❗
—
⛈️⚠️ The India Meteorological Department has issued an orange alert for heavy to very heavy rainfall at isolated places in the Mumbai Metropolitan area.❗…— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) July 21, 2025





