मिठी नदी धोक्याच्या पातळीवर पण यंत्रणा सज्ज, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आढावा

Written by:Astha Sutar
Last Updated:
मुसळधार पाऊस सुरु असून नागरिकांनी काळजी घ्यावी. आवश्यकता असेल तरच बाहेर पडावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केले आहे. या दरडप्रवण परिसराची आज उपमुख्यमंत्री शिंदे यांनी पाहणी केली. 
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर पण यंत्रणा सज्ज, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आढावा

Eknath Shinde – मुंबईत गेल्या २४ तासापासून मुसळधार पाऊस पडत आहे. या धरतीवर मुंबईतील पावसाच्या परिस्थितीबाबत सकाळी मुंबई महापालिका आयुक्तांशी देखील फोनवर चर्चा झाली आहे. मिठी नदी काठच्या परिसरात ‘एनडीआरएफ’ची पथके, बोटी तैनात आहेत. राज्य सरकार आणि पालिका प्रशासन परिस्थिती हातळण्यासाठी सज्ज असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. आज मंगळवारी मुंबई आणि ठाणे शहरातील विविध भागांची पाहणी केली. मुंबईतील मिठी नदी आणि विक्रोळी पार्कसाईट येथील दरप्रवण परिसराचीा आढावा घेतला त्यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे बोलत होते.

मिठी नदी, ठाणे इथला घेतला आढावा…

मागील तीन दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईसह ठाणे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देश शिंदे यांनी महापालिका प्रशासनाला त्यांनी दिले. ठाण्यातील नौपाडा तसेच कोपरीमधील चिखलवाडी येथे पाणी साचले आहे. हा परिसर सखल भाग असल्याने तिथे जरा पाऊस झाला की पाणी भरते. पंप लावून तेथील पाण्याचा निचरा करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री शिंदे यांनी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांना दिले.

परिस्थितीवर लक्ष ठेवून…

ठाण्यात २२५ मिलीमीटर इतका पाऊस पडला आहे. त्यामुळे सखल भागांमध्ये पाणी साचले आहे. पाण्याचा निचरा करण्यासाठी महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत.आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे काम सुरु असून पावसाच्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. वांद्रे येथील मिठी नदीचा आणि नदी काठच्या परिसराचा उपमुख्यमंत्री शिंदे यांनी भेट देऊन आढावा घेतला. दोन दिवसांपूर्वी विक्रोळी पार्कसाईट येथे वर्षा नगर या डोंगराळ वस्तीवर दरड कोसळली होती.

Astha Sutar
लेखकाबद्दल
Follow Us :GoogleNews