Marathi News

Budget 2026 : यंदा प्रथमच रविवारी सादर होणार अर्थसंकल्प!! केंद्राची मोठी घोषणा

Published:
आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशन दोन टप्प्यात होणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला भाग २८ जानेवारी ते १३ फेब्रुवारी पर्यंत चालेल, तर दुसरा भाग ९ मार्च ते २ एप्रिल पर्यंत चालेल. अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात २८ जानेवारी रोजी राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने होईल. यानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारमण १ फेब्रुवारी २०२६ रोजी अर्थसंकल्प सादर करतील
Budget 2026 : यंदा प्रथमच रविवारी सादर होणार अर्थसंकल्प!! केंद्राची मोठी घोषणा

Budget 2026 : आपल्या भारतात केंद्रीय अर्थसंकल्प दरवर्षी एक फेब्रुवारी या तारखेला संसदेत सादर केला जातो. यंदा मात्र एक फेब्रुवारी ही तारीख रविवारी येत असल्याने अर्थसंकल्प मागेपुढे होईल असं बोललं जात होतं. मात्र आता समोर आलेल्या माहितीनुसार यंदा प्रथमच रविवारी केंद्राचा अर्थसंकल्प संसदेत सादर केला जाईल. आज संसदीय कामकाजावरील मंत्रिमंडळ समितीची (CCPA) बैठक झाली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीनंतर याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे.

2 टप्प्यात अर्थसंकल्प (Budget 2026)

आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशन दोन टप्प्यात होणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला भाग २८ जानेवारी ते १३ फेब्रुवारी पर्यंत चालेल, तर दुसरा भाग ९ मार्च ते २ एप्रिल पर्यंत चालेल. अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात २८ जानेवारी रोजी राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने होईल. यानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारमण १ फेब्रुवारी २०२६ रोजी अर्थसंकल्प सादर करतील. रविवारी अर्थसंकल्प सादर होण्याची ही पहिलीच वेळ असेल. Budget 2026

हे लक्षात घ्यावे की २०१७ पासून दरवर्षी १ फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर केला जात आहे. २०१७ मध्ये अरुण जेटली यांनी पहिल्यांदा १ फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर केला. यापूर्वी, २८ फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. यावर्षी, १ फेब्रुवारी रविवारी येतो. १ फेब्रुवारीला गुरु रविदास जयंती देखील आहे. रविवार असल्याने सरकारी कार्यालये आणि शेअर बाजार बंद राहतील.

सीतारमण नवव्यांदा अर्थसंकल्प सादर करणार

दरम्यान, अर्थमंत्री निर्मला सीतारमण १ फेब्रुवारी २०२६ रोजी सलग ९व्यांदा अर्थसंकल्प सादर करतील.  त्या सर्वाधिक सलग अर्थसंकल्प सादर करणाऱ्या पहिल्या अर्थमंत्री बनतील. २०२५ मध्ये त्यांनी त्यांचे आठवे अर्थसंकल्प सादर केले. भारताच्या इतिहासात मोरारजी देसाई यांनी सर्वाधिक १० अर्थसंकल्प सादर केले आहेत, तर पी. चिदंबरम यांनी ९ अर्थसंकल्प सादर केले आहेत.

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews