Budget 2026 : विकसित भारताकडे दमदार पाऊल!! अर्थसंकल्पावर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया

Published:
विकसित भारताकडे दमदार पाऊल टाकणारा हा अर्थसंकल्प आहे. शहरीकरणाला नियोजनबद्ध करुन, उद्योग आणि उद्योजकतेला प्रोत्साहन देऊन, गुंतवणूक आणि रोजगार निर्मितीसाठी खंबीर उपाययोजना या अर्थसंकल्पातून करण्यात आल्या आहेत
Budget 2026 : विकसित भारताकडे दमदार पाऊल!! अर्थसंकल्पावर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया

Budget 2026 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अर्थसंकल्प सादर करत अनेक मोठमोठ्या घोषणा केल्या. प्रत्येक क्षेत्रासाठी त्यांनी नवनवीन घोषणा करत कोणत्या वस्तू स्वस्त होणार आणि कोणत्या वस्तू महागणार हे स्पष्ट केले आहे. खरंतर महाराष्ट्राला या अर्थसंकल्पातून नेमकं काय मिळणार आहे याकडे सर्वांचे लक्ष होतं. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतची माहिती देत अर्थसंकल्पाचे स्वागत केला आहे.

विकसित भारताकडे दमदार पाऊल Budget 2026

विकसित भारताकडे दमदार पाऊल टाकणारा हा अर्थसंकल्प आहे. शहरीकरणाला नियोजनबद्ध करुन, उद्योग आणि उद्योजकतेला प्रोत्साहन देऊन, गुंतवणूक आणि रोजगार निर्मितीसाठी खंबीर उपाययोजना या अर्थसंकल्पातून करण्यात आल्या आहेत. पायाभूत सुविधा क्षेत्रात 12 लाख कोटींची गुंतवणूक, शेती, पशुपालन, मत्स्यव्यवसाय आणि सिंचन यासाठी भरीव तरतुदी करण्यात आल्या आहेत. लखपती दिदी योजनेच्या यशानंतर महिलांसाठी स्वतंत्र मॉल्स आणि उद्योगांच्या संधी तयार करण्याची योजना अत्यंत महत्त्वाची आहे. प्रत्येक जिल्ह्यात उच्च शिक्षण घेणार्‍या मुलींसाठी वसतीगृहांची योजना तयार करण्यात आली आहे.

मुंबई पुणे नागपूरला फायदा

जिल्हा रुग्णालयात आपात चिकित्सा व्यवस्था उभी करण्याचा निर्णय आरोग्य क्षेत्रात मोलाचा ठरेल. मुंबई-पुणे, पुणे-हैदराबाद हायस्पीड कॉरिडॉरमुळे जीडीपीत मोठी वाढ होईल. प्रत्येक ग्रोथ हबसाठी 5000 कोटी प्रत्येकी 5 वर्षांत प्राप्त होणार आहेत, त्याचा लाभ मुंबई महानगर (एमएमआर), पुणे महानगर, नागपूर महानगर ग्रोथहबसाठी होणार आहे असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.