मुंबईतून महाराष्ट्राच्या राजकारणातून एक महत्वाची बातमी समोर आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत असलेली ठाकरे बंधुंची युती अखेर निश्चित झाली आहे. शिवसेना (ठाकरे गट) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं (मनसे) आगामी बेस्ट कामगार सहकारी पतसंस्था निवडणूक एकत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे राजकीय युतीच्या दृष्टीने ठाकरे बंधुंनी महत्वपूर्ण पाऊल उचलले असल्याची चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात सध्या सुरू आहे.
युतीच्या दिशेने ठाकरेंचे महत्वाचे पाऊल
खरंतर गेल्या काही महिन्यांपासून शिवसेना ठाकरे गट आणि मनसेच्या युतीची चर्चा रंगली होती. अशातच आता आगामी बेस्ट कामगार पतपेढी निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र निवडणूक लढवणार असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून शिवसेना ठाकरे गट आणि मनसेच्या युतीची चर्चा रंगली होती. अशातच आता आगामी बेस्ट कामगार पतपेढी निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र निवडणूक लढवणार असल्याची माहिती समोर आली आहे. बेस्ट पतपेढीची ही निवडणूक 18 ऑगस्टला होणार आहे. ठाकरेंच्या शिवसेनेची बेस्ट कामगार सेना आणि मनसेच्या मनसे कर्मचारी सेनेने एकत्र निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती.
बेस्टचे बहुतांश कामगार पुढारी, युनियन चे पदाधिकारी बेस्ट च्या बाहेर शिवसैनिक आणि महाराष्ट्र सैनिक म्हणून परिचित आहेत. तर कित्येक पदाधिकारी दोन्ही पक्षाचे पदाधिकारी आहेत. बेस्ट पतपेढी ची निवडणूक म्हणजे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची नांदी आहे. त्यामुळे बेस्ट मधील ठाकरे बंधू च्या युती ला फार मोठे महत्व प्राप्त झाले आहे. यावर ठाकरे बंधुंच्या युतीला आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कसे यश मिळेल, याचे मोजमाप केले जाणार आहे.
बेस्ट पतसंस्था निवडणुकीचे मोठे महत्व
बेस्ट सहकारी पतसंस्था ही फक्त आर्थिक संस्था नाही, तर ती कामगारांमध्ये असलेल्या विश्वासाचे प्रतिनिधीत्व करते. या निवडणुकीत ज्या संघटनेचा पॅनल विजयी ठरतो, त्यांची पकड बेस्ट उपक्रमात अधिक मजबूत होते. त्यामुळे ही निवडणूक आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी दिशादर्शक ठरू शकते.दोन्ही संघटनांनी युतीचा आधार मराठी अस्मिता आणि रोजगाराच्या मुद्द्यांवर ठेवला आहे. बेस्टमधील कर्मचाऱ्यांपैकी बहुतांश जण शिवसेना किंवा मनसेशी जवळीक असलेले आहेत. काही पदाधिकारी तर दोन्ही संघटनांमध्ये कार्यरत आहेत. यामुळे या युतीमुळे बेस्टमधील मराठी कामगारांची शक्ती पुन्हा एकवटली जाईल, अशी भावना व्यक्त होत आहे.





