सप्टेंबर महिन्यात राज्याच्या सर्वच भागात पावसाने कहर केला. मात्र आज 30 सप्टेंबर रोजी राज्यात सर्वदूर पाऊस मंदावला आहे. अनेक ठिकाणी सुर्यदर्शन होत असून निरभ्र आकाश पाहायला मिळत आहे. पावसाने चांगली उघडीप दिल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळताना दिसत आहे. शिवाय सरकारी पातळीवर अतिवृष्टीचे पंचनामे आणि नुकसान भरपाईच्या कामांना देखील आता वेग येणार आहे.
राज्यभरात पावसाची विश्रांती
काही दिवसांपासून मुसळधार पावसाचा जोर अनुभवून झाल्यानंतर आज, 30 सप्टेंबर 2025 रोजी मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या भागांत पावसाला थोडासा ब्रेक मिळाला आहे. मराठवाडा आणि विदर्भात देखील पावसाने दोन दिवसांपासून ब्रेक घेतल्याचे चित्र आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार आज या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पावसाची शक्यता नाही. त्यामुळे नागरिकांना गेले काही दिवस जाणवलेला मुसळधार पावसाचा तडाखा आज कमी होणार आहे.
हे ही वाचा
मुंबईसह कोकणाला दिलासा
रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या कोकण किनारपट्टीवरील भागांतही मुसळधार पावसाला आज थोडा ब्रेक मिळाला आहे. सकाळपासून ढगाळ वातावरण असून काही ठिकाणी हलक्या सरी पडू शकतात, मात्र जोरदार पाऊस नाही. तापमान 26°C ते 30°C दरम्यान राहील आणि वाऱ्याचा वेग 12-15 किमी/तास असेल. दमट हवामानामुळे किनारी भागांत उकाडा अधिक जाणवण्याची शक्यता आहे.