MP Breaking News
Wed, Dec 17, 2025

Prithviraj Chavan On Operation Sindoor : ऑपरेशन सिंदूरवेळी पहिल्याच दिवशी आपली विमाने पाडली; पृथ्वीराज चव्हाण यांच्या दाव्याने खळबळ

Published:
ऑपरेशन सिंदूरवेळी पहिल्याच दिवशी आपली विमाने पाडली आणि आपला पराभव झाला होता असा नवा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. पृथ्वीराज चव्हाण यांच्या या दाव्यानंतर संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे.
Prithviraj Chavan On Operation Sindoor : ऑपरेशन सिंदूरवेळी पहिल्याच दिवशी आपली विमाने पाडली; पृथ्वीराज चव्हाण यांच्या दाव्याने खळबळ

Prithviraj Chavan On Operation Sindoor १९ डिसेम्बरला देशाला मराठी पंतप्रधान मिळणार असा दावा करून खळबळ निर्माण करणाऱ्या माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि आणखी एक खळबळजनक विधान करत सर्वांचे लक्ष्य वेधलं आहे. ऑपरेशन सिंदूरवेळी पहिल्याच दिवशी आपली विमाने पाडली आणि आपला पराभव झाला होता असा नवा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. पृथ्वीराज चव्हाण यांच्या या दाव्यानंतर संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. विरोधकांनी मात्र पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा पूर्णपणे फेटाळून लावला आहे. तसेच पृथ्वीराज चव्हाण यांनी सैन्याचा अपमान केला आहे अशी प्रतिक्रिया विरोधकांनी केली आहे.

नेमकं काय म्हणाले पृथ्वीराज चव्हाण? Prithviraj Chavan On Operation Sindoor

ऑपरेशन सिंदूरवेळी पहिल्याच दिवशी आपण हरलो होतो. कोणी मान्य करो अथवा न करो पण ऑपरेशन सिंदूरवेळी ७ मे रोजी पहिल्या दिवशी पाकिस्तानने भारताची विमानं पाडली. त्यानंतर भारताचा संपूर्ण एअरफोर्स ग्राऊंड झाला. त्यानंतर भारताचे दिवसभरात एकही विमान उडाले नाही. भारतीय वायूदलाचे विमान कुठेही उडाले तर… ग्वाल्हेर, भटिंडा, सिरसा अशा सर्व हवाई तळांवरुन एकही विमान उडाले नाही. कारण त्याठिकाणी पाकिस्तानकडून विमान पाडले जाण्याची शक्यता होती, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले.

ते पुढे म्हणाले, आपल्याकडे १२ लाख सैन्य आहे, २५ लाख सैन्य आहे की १ कोटी सैन्य आहे याला काही अर्थ नाही. कारण युद्धच होणार नाही तुम्हाला कुणी युद्ध करुच देणार नाही. ऑपरेशन सिंदूरवेळी सुद्धा आपण हेच पाहिलं.ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्कराची एक किलोमीटरही हालचाल झाली नाही. हवाई युद्धं झाली, पुढची युद्धंही तशीच होणार आहेत. मग आपल्याला १२ लाख लष्कर ठेवण्याची काही गरज आहे का? असा सवाल करत त्याऐवजी त्यांच्याकडून दुसरं काहीतरी काम करुन घेऊ असंही पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं. Prithviraj Chavan On Operation Sindoor

एकनाथ शिदंचं प्रत्युत्तर –

पृथ्वीराज चव्हाण यांच्या विधानावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टीका केली आहे, भारताचा युद्धात पराभव झाला, असं बोलणाऱ्यांना पाकिस्तानचा विजय हवा आहे का? ही कसली राष्ट्रभक्ती, हा तर देशद्रोह आहे, अशाप्रकारची वक्तव्यं करणाऱ्यांचा मी निषेध करतो. भारतीय लष्कराने ज्याप्रकारे पाकिस्तानला प्रत्युत्तर दिले, त्याचा देशाला गर्व आहे. पण पृथ्वीराज चव्हाण यांना पाकिस्तानविषयी गर्व वाटत आहे. जनता त्यांना धडा शिकवेल. पाकिस्तानचे गुणगान करणे, हा देशद्रोह आहे अशा शब्दांत शिंदेनी पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर पलटवार केला.