महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून सातत्याने काही घटना आणि वादादीत घडामोडी समोर येत असतात. आज खरंतर नगरपरिषद आणि नगरपंचायतींसाठी मतदान पार पडले. बऱ्याच ठिकाणी अनेक वादांचे प्रसंग देखील उद्भवले. मात्र दिवसभरात मतदान होत असलेल्या काही ठिकाणी गैरप्रकार झाल्याने मतदानाला गालबोट लागल्याचं दिसून आलं. अशा काही घटनांचा मागोवा घेऊ…
दिवस बोगस मतदान आणि EVM बिघाडामुळे गाजला!
राज्यातील 23 नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसह विविध जिल्ह्यांतील एकूण 143 सदस्यपदांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली आहे. सकाळी 7.30 वाजता ही मतदानाची प्रक्रिया सुरू झाली. मतदारांचा देखील चांगल्या स्वरूपाचा प्रतिसाद मिळताना दिसला. सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत मतदान होत होते. मात्र दिवसभरात मतदान होत असलेल्या काही ठिकाणी गैरप्रकार झाल्याने मतदानाला गालबोट लागल्याचं दिसून आलं. अशा काही घटनांचा मागोवा घेऊ…
मात्र मतदान होत असलेल्या काही ठिकाणी गैरप्रकार झाल्याने मतदानाला गालबोट लागल्याचं दिसून आलं. अंबरनाथच्या कोहोजगाव परिसरात एक खळबळजनक बातमी समोर आली. अंबरनाथमध्ये 208 संशयित मतदारांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्या सर्वांची आधार कार्ड व पॅन कार्डद्वारे सखोल तपासणी करण्यात आली. हे नागरिक मतदानासाठी आले होते का, कोणासाठी मतदान करणार होते याचीही चौकशी करण्यात आली. संशयित बोगस मतदारांमुळे एकच गोंधळ उडाला. या सगळ्या प्रकारामुळे इथलं वातावरण तापलं होतं.
नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकीसाठी राज्यात काही ठिकाणी मतदान सुरू आहे. पण या मतदानाला अनेक ठिकाणी गालबोट लागलं आहे. अशातच नांदेड जिल्ह्यातील धर्माबादमध्ये एका मतदान केंद्रावर बोगस मतदान करत असल्याचा आरोप करत भाजप नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराच्या मुलीला मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे.
दुसरीकडे यवतमाळमध्ये एका मतदान केंद्रावर EVM मध्ये बिघाड झाल्याचे आढळले. मतदाना केंद्राबाहेर मतदारांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या, मात्र EVM बिघडल्याने मतदान करता येत नसल्याने अनेक मतदार खोळंबले. अशा घटना राज्यातील अनेक ठिकाणी आज दिवसभरात अनेक ठिकाणी घडल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे याबाबत अधिक माहिती नेमकी पुढे काय येते, ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
नेत्यांनी कंबर कसली; प्रतिष्ठा पणाला
राज्यातील नगरपरिषदा व नगरपंचायतीच्या निवडणुका 2 डिसेंबर रोजी पार पडल्या. मात्र, त्यापैकी 23 नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आज त्या उर्वरित 23 नगरपरिषद आणि नगरपंचायतीचे मतदान होणार आहे. निकाल उद्याच म्हणजे 21 डिसेंबर रोजी लागेल. 23 नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या अध्यक्ष व सदस्यांचे भविष्य आज ठरणार आहे. नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर काही प्रमाणात घोळ बघायला मिळाला. 2 डिसेंबरला मतदान आणि 3 डिसेंबरला निकाल होता.
21 डिसेंबर रोजी निकाल जाहीर होणार
मात्र, कोर्टाच्या निर्णयानंतर 21 डिसेंबरपर्यंत निकाल राखीव ठेवण्यात आली. आता आता 23 नगरपरिषद आणि नगरपंचायतीची मतदान प्रक्रिया पार पडेल. अंबरनाथ, कोपरगाव, देवळाली प्रवरा, पाथर्डी, नेवासा, बारामती, फुरसुंगी-उरुळी देवाची, सोलापूरातील अनगर, मंगळवेढा, साताऱ्यातील महाबळेश्वर, फलटणसह 23 23 नगरपरिषद आणि नगरपंचायतीची आज मतदान प्रक्रिया पार पडेल. त्यामुळे उद्याच्या निकालात नेमके काय चित्र दिसते ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.





